• Download App
    protest | The Focus India

    protest

    Chagan Bhujbal : ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरे वाटेकरी नको; लाखोंच्या लोंढ्यांसह मुंबईत येणार, छगन भुजबळांचा इशारा

    आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही देखील लाखोंच्या लोंढ्यासह मुंबईत दाखल होणार आणि आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. तसेच ओबीसी प्रवर्गात अजून कोणत्याही जातीला आणू नका, असेही त्यांनी पत्रकार परिषदेतून म्हटले आहे.

    Read more

    Supriya Sule : मराठा आंदोलनात सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बाटल्या फेकल्या; मनोज जरांगेंना भेटून परतताना आंदोलकांचा घेराव

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Supriya Sule राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जात भेट घेतली. यावेळी […]

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले- एकतर विजयी यात्रा, नाहीतर अंत्ययात्रा; आम्ही OBC सोबत जाणारच!

    सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना खडसावले आहे. यावेळी बोलताना जरांगे यांनी म्हटले की सन्मान दिला नाही तर नेते आंदोलनस्थळी यायला घाबरतील. सन्मानाने येऊ द्या आणि सन्मानाने पाठवा, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. एकतर विजयी यात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल, असेही यावेळी जरांगे म्हणाले.

    Read more

    Maratha reservation : मराठा आरक्षण आंदोलन; शिष्टमंडळासोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर राजकीय हालचालींना वेग

    मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी सरकारवरील दबाव वाढला आहे.

    Read more

    Manoj Jarange : रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे संतप्त; ‘कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?

    मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आणि मुंबई पोलिसांमध्ये आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबई पोलिसांनी जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी दिली असली, तरी रोज नवीन अर्ज दाखल करण्याची अट घातली आहे. या अटीमुळे संतप्त झालेल्या जरांगे यांनी थेट पोलिसांना परवानगीसाठी अर्ज करताना काही कठोर प्रश्न विचारले आहेत.

    Read more

    Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते म्हणाले- मनोज जरांगेंना कायद्यासमोर मोठे समजू नये, आंदोलन आटोपते घेऊन त्याला त्याच्या गावी धाडा

    मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र टीका केली आहे. त्यांनी मनोज जरांगेला कायद्यापेक्षा मोठे समजू नये, असे म्हटले आहे. जरांगेचे आंदोलन आटोपते घेऊन त्याला त्याच्या गावी धाडावे, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.

    Read more

    Shinde Committee : मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचे तत्त्वतः मान्य; शिंदे समितीचा जरांगेंना शब्द

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समितीला चर्चेसाठी पाठवून राज्याच्या राज्य सरकारसह राज्याच्या राजभवनाचा व दोन्ही कायदेमंडळांचा अपमान केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी केला. सरकारने आमच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाला पाठवण्याची गरज होती. पण त्यांनी शिंदे समितीला पाठवले. हे साफ चूक आहे. असे करून फडणवीसांनी राज्याचा अपमान केला, असे ते म्हणाले. दरम्यान, न्या. संदीप शिंदे समितीने यावेळी मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी असल्याचे तत्वतः मान्य केले. हा मराठा समाजासाठी एक मोठा दिलासा असल्याचा दावा केला जात आहे.

    Read more

    OBC Mahasangh : ओबीसी महासंघाचा मराठा आरक्षणाला विरोध:नागपुरात साखळी उपोषण सुरू; मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास नकार

    मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. नोंदी मिळालेल्या ५४ लाख मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे. ते पाहता सरकार दबावात निर्णय घेण्याची भीती ओबीसी समाजात आहे. मात्र दबावात येऊन निर्णय घेतल्यास वा तसे दिसल्यास आम्हीही आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा रोखठोक इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. सरकारने कुणबी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही मुंबईत धडकू, असा सज्जड इशाराही तायवाडे यांनी यावेळी दिला.

    Read more

    BJP Protests : राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या पुतळ्यांचे दहन; PM मोदींबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा भाजपकडून निषेध

    जमुई येथे शुक्रवारी भाजप युवा मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अभिषेक सिंह यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला. काँग्रेस कार्यालयाबाहेर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे पुतळे जाळण्यात आले.

    Read more

    Laxman Hake : महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे त्यांच्या समर्थांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत थेट इशारा दिला आहे.

    Read more

    Ramdas Athawale : मंत्री रामदास आठवलेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा; रिपाइंचा ठराव मंजूर

    मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा पाठिंब्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत- कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही; पण मराठा नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही मराठा समाजासाठी हिताची नाही, असे ते म्हणालेत. तसेच मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे जरांगेंना हाणला.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना हमीपत्र; कायदा व सुव्यवस्था राखण्यासह दिली 20 आश्वासने

    मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर, त्यांनी पोलिसांना हमीपत्र सादर केले आहे. या हमीपत्रात जरांगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलिसांच्या अटी-शर्तींचे पालन करण्यासाठी 20 आश्वासने दिली आहेत. आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करूनच सर्व कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे हमीपत्र मनोज जरांगे यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात सादर केले.

    Read more

    Jarange Patil : जरांगे म्हणाले- मराठा आरक्षण द्या, अन्यथा सरकार उलथवून टाकू, मुंबईत बेमुदत उपोषणाला बसणार

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात १० टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा सरकार उलथवून टाकू, असा अल्टिमेटम मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी सोमवारी दिला. आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मुंबईत २९ तारखेपासून आपण व मराठा कार्यकर्ते बेमुदत उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    Read more

    Microsoft : मायक्रोसॉफ्ट मुख्यालयातून 18 कर्मचाऱ्यांना अटक; इस्रायलशी कराराला विरोध करत होते

    मायक्रोसॉफ्टच्या वॉशिंग्टन येथील मुख्यालयात निदर्शने करणाऱ्या १८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एक मायक्रोसॉफ्टचा कर्मचारी आहे. नो अझूर फॉर अॅपार्थिड ग्रुपशी संबंधित हे लोक मायक्रोसॉफ्टच्या इस्रायलसोबतच्या क्लाउड कराराच्या विरोधात कार्यालयात निदर्शने करत होते.

    Read more

    Lok Sabha : ऑनलाइन गेमिंगवर बंदीसह लोकसभेत 4 विधेयके सादर, विरोधी पक्षाच्या खासदारांचा चर्चेस नकार

    अमित शहा यांनी लोकसभेत तीन विधेयके सादर केली तेव्हा विरोधकांनी त्यांच्या प्रती फाडल्या आणि गृहमंत्र्यांवर कागदपत्रे फेकली. काही विरोधी खासदारांनी कागदाचे गोळे बनवून त्यांच्यावर फेकले. त्यानंतर हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्यात आले.

    Read more

    Lok Sabha : लोकसभेत अंतराळवीर शुभांशू शुक्लांवर विशेष चर्चा; जितेंद्र सिंह म्हणाले- देश अंतराळ मोहिमेचे यश साजरे करत आहे, विरोधकांची नारेबाजी

    मतचोरीच्या आरोपावरून विरोधकांच्या गदारोळात, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या यशस्वी अंतराळ मोहिमेवर लोकसभेत दुपारी २ वाजता चर्चा सुरू झाली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, आज देश शुभांशूंच्या परतीच्या अंतराळ मोहिमेचा आनंद साजरा करत आहे परंतु विरोधी पक्ष अजूनही गोंधळ घालत आहेत आणि चर्चेसाठी तयार नाहीत.

    Read more

    Anna Hazare : पुण्यातील ‘अण्णा आता तरी उठा’ फ्लेक्सवर अण्णा हजारेंची नाराजी; म्हणाले – मीच लढत राहावे ही अपेक्षा चुकीची

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतांच्या चोरीच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे काही फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्सवरून अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली असून देशातील तरुणाईला देखील चांगलेच खडसावले. मी दहा कायदे आणले आहेत, पण 90 वर्षांनंतरही मीच सगळे करत राहावे आणि तुम्ही झोपून राहावे ही अपेक्षा चुकीची आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.

    Read more

    Rahul Gandhi : बिहारमध्ये ‘वोटर अधिकार यात्रा’, लालू-राहुल म्हणाले- ही संविधान वाचवण्याची लढाई; तेजस्वी निवडणूक आयोगाला कठपुतली म्हणाले

    बिहारमध्ये विशेष सघन सुधारणा (SIR, सामान्य शब्दात मतदार यादी सुधारणा) विरुद्ध राहुल गांधी यांची ‘वोटर अधिकार यात्रा’ सासाराम येथून सुरू झाली. येथील सुआरा विमानतळ मैदानावर झालेल्या जाहीर सभेत राहुल म्हणाले, ‘ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. भाजप-आरएसएस संपूर्ण देशात संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.’

    Read more

    Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्ड वाढवले; राष्ट्रपतींनी सांगितले होते- राजधानीतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या आदेशानुसार, पश्चिम व्हर्जिनिया, दक्षिण कॅरोलिना आणि ओहायोच्या राज्यपालांनी शनिवारी त्यांच्या राज्यांमधून नॅशनल गार्डचे सैन्य वॉशिंग्टनला पाठवण्याची घोषणा केली आहे.

    Read more

    Manoj Jarange : दिसेल त्या मार्गाने मुंबईत घुसा; मनोज जरांगे यांचा मागे न हटण्याचा निर्धार; महाराष्ट्र कायमचा बंदचाही इशारा

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आत्ता चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी बुधवारी परभणीत बोलताना मराठा समाजाला 29 ऑगस्ट रोजी दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन केले. आमचे आंदोलन शांततेत होईल. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कुरापत करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

    Read more

    Lakshman Hake : मनोज जरांगेंचा मुंबईत दंगल घडवण्याचा डाव; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा दावा, त्यांना आंतरवाली सराटीत रोखण्याचे आवाहन

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत जाळपोळ व दंगल घडवण्याचा कट आहे. त्यामुळेच ते ऐण सनावारांच्या दिवसांत मुंबईला जात आहेत, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी केला. या प्रकरणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगेंना आंतरवाली सराटीतच रोखण्याचे आवाहनही केले आहे.

    Read more

    Jain Monk : कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा; म्हणाले – धर्माविरोधात जाल, तर कोर्टालाही मानणार नाही

    मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाचा आदेश लागू असूनही अलीकडेच दादर कबुतरखान्याजवळ काही जैन बांधवांनी कबुतरांना धान्य टाकले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना थांबवले. या कारवाईनंतर जैन समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, 13 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहेत. तर वेळ पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रंही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नसल्याचा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.

    Read more

    Kolkata Rape : कोलकाता रेप-मर्डर केसला एक वर्ष पूर्ण, डॉक्टरांची रॅली; संघटनेने म्हटले- सीबीआय तपास कधी पूर्ण होणार?

    कोलकात्याच्या आरजी कार रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येला आज एक वर्ष झाले आहे. शुक्रवारी कोलकात्यात ज्युनियर डॉक्टर आणि नागरी समाजाच्या सदस्यांनी मशाल रॅली काढली. पीडितेसाठी लढणाऱ्या अभय मंचच्या डॉ. सुवर्णा गोस्वामी म्हणाल्या- तपास संस्था सीबीआय या प्रकरणात मोठ्या कटाबद्दल बोलत आहे, परंतु त्याची चौकशी कधी पूर्ण होईल हे माहिती नाही.

    Read more

    Khalid Ka Shivaji : ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर वादग्रस्त संवाद हटवणार

    खालिद का शिवाजी’ शिवाजी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील काही संवादांवरून अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून या चित्रपटाचा तीव्र विरोध केला जात आहे. चित्रपटाला वाढता विरोध पाहता, सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक पत्रक जाहीर करून वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. “सिनेमाच्या आशयामुळे कोणाच्या भावना दुखावाव्यात, असा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे संबंधित दृश्ये आणि संवाद पुन्हा एकदा तपासले जात असून, आक्षेपार्ह भाग हटवला जाणार आहे.” असे निर्मात्यांनी म्हटले आहे.

    Read more