Lok Sabha : कंपनी डिफॉल्ट झाल्यास सर्वात आधी कामगारांना थकबाकी मिळेल; बँक दिवाळखोरी सुधारणा विधेयक मंजूर
लोकसभेने 30 मार्च रोजी दिवाळखोरी कायद्यातील बदलांचे विधेयक मंजूर केले. आता कोणतीही कंपनी दिवाळखोर झाल्यास तिची मालमत्ता विकून जो पैसा मिळेल, त्यातून सर्वात आधी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे थांबलेले वेतन आणि थकबाकी दिली जाईल. त्यानंतरच इतर लोकांना पैसे दिले जातील.