• Download App
    Political Statement | The Focus India

    Political Statement

    Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांची सावरकरांवर आक्षेपार्ह टीका; म्हणाले- गांधीहत्या कटात भगूरचा 60 रुपये पेन्शन घेणारा सहआरोपी होता

    महात्मा गांधीजींची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता आणि नथुराम गोडसे हाच पहिला दहशतवादी होता,’ असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरही अप्रत्यक्ष आणि आक्षेपार्ह टीका करत, ‘गांधी हत्येच्या कटातील सहआरोपी ब्रिटिशांकडून पेन्शन घेणारा होता,’ असा गंभीर आरोप केला आहे. ते गुरुवारी नाशिकमध्ये बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

    Read more

    Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार म्हणाले- सर्व काही एकाच समाजाला, तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल

    एकाच समाजाला सर्व काही पाहिजे. EWS पाहिजे, ओबीसी पाहिजे, आणि एसईबीसीमधून पाहिजेत. त्यांना सारथी-मधून फायदा पाहिजे महाज्योतीमधूनही फायदा पाहिजे. मग बाकीच्यांनी जगायचे का नाही? जरांगे पाटील यांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकावे. ही जी सत्तेची दादागिरी आहे आणि हे बरोबर नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

    Read more

    prakash ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले- धनगर समाजाने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व करावे; आरक्षणवादी जनतेला सोबत घ्या, सवर्णांना मतदान करू नका

    ओबीसी लढ्याचे नेतृत्व धनगर समाजाने हाती घ्यावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. आगामी निवडणुकीत ओबीसीने आरक्षणवादी जनतेला सोबत घेऊन निवडणूक लढवावी, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच सवर्णांना मतदान करण्याऐवजी एससी-एसटी उमेदवारांना आणि ते नसतील तर मुस्लिमांना मतदान करावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले. धनगर समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज पुण्यात पार पडले. या अधिवेशनात प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. या अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे हिंदीच्या सक्तीवर आक्रमक; सरकारला हिंदी शिकवून दाखवण्याचे आव्हान; सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र

    आपण हिंदू आहोत हिंदी नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी भाषेची शक्ती दक्षिण भारतातील राज्यात कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आज भाषा सक्ती करत आहात, उद्या इतरही सक्ती होऊ शकते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकावला जाईल, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी सरकारला दिलेली पत्र देखील त्यांनी वाचून दाखवले. तसेच त्यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिले असून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. या निर्णयामागे आयएएस लॉबी असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

    Read more