Pigeon Houses : कबुतरखान्यांचं काय करायचं?; सरकारपुढे पेच !
अलीकडेच मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद करत कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ न टाकण्याचे आवाहन केले आहे. मात्र खायला मिळत नसल्याने कबुतरांचा मृत्यू होऊ लागल्याचं सांगत, जैन समाजाने यावर आक्रमक भूमिका घेतली. तसेच राज्य सरकारने मुंबईतील कबुतरखाने तडकाफडकी बंद करु नयेत, असा प्रस्तावही मांडला.