• Download App
    photos | The Focus India

    photos

    Modi Chairs : मोदींच्या अध्यक्षतेत सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक; अमित शहा, NSA डोभाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक बोलावली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते. दिल्ली लाल किल्ल्यावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मोदींनी ही बैठक बोलावली.

    Read more

    Jitendra Awhad : मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड, नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी केला पराभव

    मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विविध पदांवर नवीन चेहऱ्यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव करून विजय मिळवला. तर, सचिव पदासाठी उन्मेष खानविलकर यांनी शाह आलम शेख यांचा पराभव करत बाजी मारली. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली, त्यांनी गौरव पय्याडे यांना पराभूत केले. दरम्यान, एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची याआधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या संपूर्ण निवडणुकीसाठी एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, फुकटचा ताठा अन् नाव उबाठा; खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले!

    शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी अनुदानाच्या मुद्यावरून मराठवाड्याचा दौरा करत महायुती सरकारवर ‘दगाबाज’ म्हणत टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली? खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. तसेच, ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा करताना शेतकऱ्यांना ‘एक बिस्किटचा पुडाही’ दिला नाही, अशी खोचक टीका करत ‘फुकटचा ताठा अन् नाव उबाठा’ असा उपरोधिक हल्लाबोलही केला.

    Read more

    Sri Lankan Team : इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकन संघाने पाकिस्तान सोडले; गृहमंत्र्यांनी सुरक्षेचे आश्वासन दिले होते

    इस्लामाबादमधील आत्मघाती हल्ल्यानंतर, श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या म्हणण्यानुसार, संघाचे अर्ध्याहून अधिक खेळाडू मायदेशी परतले आहेत.

    Read more

    सरकारने दिल्ली ब्लास्टला दहशतवादी घटना मानले; टेरर कनेक्शनमधील दुसरी संशयित कार फरिदाबादेत सापडली

    केंद्र सरकारने दिल्लीतील कार बॉम्बस्फोटांना दहशतवादी हल्ला म्हणून मान्यता दिली आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला.

    Read more

    Chhagan Bhujbal : भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना 8 पानी पत्र- सरकारने मराठा आरक्षणाचा GR प्रचंड दबावाखाली काढला

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मराठा आरक्षणाशी संबंधित काढलेला जीआर हा प्रचंड दबावाखाली काढल्याचा आरोप राज्यातील एक बडे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे

    Read more

    Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांचा सवाल- गुलाल उधळला होता, तर जरांगे पुन्हा मुंबईत का आले? ओबीसींचे आरक्षण वाढवा!

    मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबावर आरोप करत त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. तसेच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.

    Read more

    Vikhe Patil : विनोद पाटलांवर विखे पाटलांचा पलटवार, म्हणाले- चर्चा सुरू होती तेव्हा ताजमध्ये झोपले होते!

    राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत त्यानुसार जीआर देखील काढण्यात आला आहे. परंतु, या जीआरचा टाचणी एवढाही फायदा किंवा उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही मिळणार नसल्याची टीका मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. यावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच यावेळी बोलताना विखे पाटलांनी विनोद पाटलांवर टीका देखील केली आहे.

    Read more

    Vinod Patil : विनोद पाटलांचा दावा- हा शासन निर्णय नसून, केवळ माहिती पुस्तिका; मराठा समाजाला फायदा नाही!

    मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनानंतर, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा लाभ देण्यासाठी एक शासन निर्णय जारी केला. मात्र, मराठा आरक्षण याचिकाकर्ते आणि कार्यकर्ते विनोद पाटील यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. विनोद पाटील यांच्या मते, हा शासन निर्णय नसून, केवळ एक माहिती पुस्तिका आहे. त्यामुळे, या जीआरमुळे मराठा समाजाला कोणताही फायदा होणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

    Read more

    Sadavarte : सदावर्तेंचा हल्लाबोल- मराठा आरक्षणाचा जीआर म्हणजे व्हायरस, कॅबिनेट बैठकीत शासन निर्णय मागे घ्यावा!

    राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला. त्यानंतर मराठा आंदोलकांनी मुंबई सोडली. मनोज जरांगे यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. त्यानंतर आता या जीआरवर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील पत्रकार परिषद घेत हा जीआर म्हणजे व्हायरस असल्याची टीका केली आहे.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचणी नाहीत; भुजबळांशी चर्चा करून नाराजी दूर करू!

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले होते. 5 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर राज्य सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने जीआर देखील काढला आहे. परंतु, या जीआरला ओबीसी नेत्यांनी विरोध केला असल्याचे दिसत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या जीआरच्या निषेधार्थ आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला होता. या सगळ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Anjali Damaniya : लक्ष्मण हाकेंनी ‘मौन आंदोलन’ 12 महिने 13 काळ करावे; अंजली दमानियांचा टोला

    मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत महायुती सरकारची चांगलीच कोंडी केली होती. 5 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा बांधवांच्या मागण्या मान्य केल्या व आरक्षणासंदर्भातील जीआर काढला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. त्यावर लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. बेकायदा मागणीसाठी हे आंदोलन होते तसेच मुख्यमंत्री हतबल असल्याचे देखील हाके यांनी म्हटले आहे. तसेच आता त्यांनी मौन आंदोलन देखील सुरू केले आहे. याव

    Read more

    Azerbaijan : अझरबैजानने म्हटले- भारताने SCO मध्ये एंट्री रोखली; पाकिस्तानशी संबंधांचा बदला घेतोय भारत, राष्ट्रपती अलियेव यांचा आरोप

    अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव यांनी भारतावर पाकिस्तानशी असलेल्या अझरबैजानच्या जवळीकतेचा जागतिक व्यासपीठांवर बदला घेतल्याचा आरोप केला आहे. सोमवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी हे विधान केले.

    Read more

    Quetta : पाकिस्तानातील क्वेट्टामध्ये रॅलीदरम्यान स्फोट, 14 ठार: 30 हून अधिक जखमी

    मंगळवारी रात्री पाकिस्तानातील क्वेट्टा येथे बलुच नॅशनल पार्टीची रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅली संपल्यानंतर लगेचच बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, ज्यांवर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये माजी खासदार अहमद नवाज आणि पक्षाचे नेते मुसा बलोच यांचाही समावेश आहे.

    Read more

    Sharjeel Imam : 2020 दिल्ली दंगलीप्रकरणी शरजील इमाम, उमर खालिद यांचा जामीन फेटाळला; 9 याचिका फेटाळल्या

    २०२० च्या दंगलीच्या कट रचल्याप्रकरणी उमर खालिद आणि शरजील इमामसह ९ आरोपींच्या जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. हे सर्व आरोपी २०२० पासून तुरुंगात आहेत. त्यांनी जामीन अर्ज फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

    Read more

    Suhana Khan : शाहरुखच्या मुलीने शेतकऱ्यांना दिलेली सरकारी जमीन खरेदी केली; सुहानावर परवानगीशिवाय जमीन खरेदीचा आरोप

    बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एका जमिनीच्या व्यवहारामुळे अडचणीत सापडली आहे. हे प्रकरण अलिबागमधील थल गावाचे आहे, जिथे सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी जमीन दिली होती. सुहानाने ही जमीन खरेदी केली. जमीन खरेदी करण्यासाठी तिने आवश्यक परवानगी घेतली नसल्याचा आरोप आहे आणि कागदपत्रेही पूर्ण केली नाहीत.

    Read more

    PM Modi :PM मोदी म्हणाले- जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली; एक दिवस जग म्हणेल मेड इन इंडिया

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सेमिकॉन इंडिया-२०२५ चे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “आज संपूर्ण जग भारतावर विश्वास ठेवते. जग भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास तयार आहे.”

    Read more

    K. Kavitha : केसीआर यांनी मुलगी कविता यांना पक्षातून निलंबित केले; म्हणाले- BRS विरोधी कारवायांमध्ये सहभागी:

    भारतीय राष्ट्र समिती (BRS) ने मंगळवारी एमएलसी के. कविता यांना पक्षातून निलंबित केले. कविता यांचे वडील आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी हा निर्णय घेतला. बीआरएसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “कविता यांच्या कारवाया पक्षाविरुद्ध होत्या. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.”

    Read more

    Afghanistan : अफगाणिस्तान भूकंपातील मृतांची संख्या 1400 पार; भारताने पाठवले 15 टन अन्न आणि 1000 तंबू

    अफगाणिस्तानातील भूकंपात मृतांचा आकडा १४११ वर पोहोचला आहे, तर जखमींची संख्या ३२५० पेक्षा जास्त झाली आहे. वृत्तसंस्था एपीनुसार, तालिबानने ही माहिती दिली आहे.रविवारी रात्री अफगाणिस्तानातील जलालाबादजवळ ६.० तीव्रतेचा भूकंप झाला. त्यावेळी बहुतेक लोक झोपले होते, त्यामुळे ते इमारतींच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

    Read more

    Chagan Bhujbal : मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, त्यांना वेगळे आरक्षण द्या; छगन भुजबळ यांची मागणी

    राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको, अशी मागणी केली आहे. तसेच आज पुन्हा एकदा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचे म्हटले आहे.

    Read more

    Laxman Hake : सरकारचा जीआर म्हणजे ओबीसी आरक्षण संपवण्याचे काम; लक्ष्मण हाकेंचा मराठा आरक्षणावर संताप

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयाला संविधानविरोधी आणि ओबीसी समाजाचे आरक्षण संपवणारा निर्णय म्हटले आहे. तसेच या निर्णयाविरोधात ओबीसी समाज न्यायालयीन तसेच रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला.

    Read more

    Eknath Shinde : शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देणार असे सांगितले होते; जरांगेंच्या उपोषणानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

    महायुती सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात आजचा निर्णय हा देखील मोठा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मी याआधी जाहीर सभेत शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार एसईबीसीमधून दिले होते. ते टिकवले देखील, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- हैदराबाद गॅझेटमुळे OBC आरक्षणाला धक्का नाही; फक्त नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळेल

    मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आणि आंदोलकांमध्ये झालेल्या यशस्वी तोडग्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सरकारने मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची सरकारची सुरुवातीपासूनची तयारी होती. पण मनोज जरांगे यांची सरसकट आरक्षणाची मागणी कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नव्हती. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता, ‘सरसकट’ आरक्षण देणे शक्य नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    Read more

    Manoj Jarange : आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस; भावना व्यक्त करताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर

    संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेषतः मराठवाड्यासाठी आज सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचे कल्याण झाले. हा माझ्या समाजासाठी सुवर्णक्षण असून आज दिवाळी साजरी करा, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षणासाठीचा शासन निर्णय आल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. तसेच यावेळी मनोज जरांगे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

    Read more

    Surat Textile : सुरतच्या कापड गिरणीत ड्रम स्फोटामुळे भीषण आग; 2 ठार, अनेक जण अडकल्याची भीती

    गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील जोलवा गावातील संतोष टेक्सटाईल मिलमध्ये सोमवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मिलमध्ये अचानक रसायनांनी भरलेला ड्रम फुटला, ज्यामुळे मिलमध्ये आग लागली. या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

    Read more