PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘परीक्षा पे चर्चा’च्या नवव्या आवृत्तीच्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बोर्डाच्या परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, परीक्षेला ओझे मानू नका, तर ती एका उत्सवाप्रमाणे साजरी करा. शिक्षण केवळ गुणांपुरते मर्यादित नसून ते जीवन सुधारण्याचे माध्यम आहे. गुणांच्या शर्यतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंतप्रधानांनी विचारले की, गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव कोणाला आठवते का? विद्यार्थ्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिल्यावर ते म्हणाले की, यावरून हे स्पष्ट होते की गुण क्षणिक असतात, तर जीवनाची दिशा अधिक महत्त्वाची असते.