Rahul Gandhi : राजस्थानात राहुल गांधींची मोदी सरकारवर विद्यार्थी प्रश्नांवरून तोफ; नेमकं काय घडलं?
राजस्थानमधील कोटा येथे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी १७ जून रोजी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर, परीक्षा व्यवस्थेवर आणि पेपरफुटीच्या घटनांवर जोरदार टीका केली. हा कार्यक्रम “छात्रों की गूंज” या मोहिमेचा भाग असून, देशव्यापी विद्यार्थी आंदोलनाची सुरुवात कोट्यातून करण्यात आली.