Pakistan : पाकिस्तानसोबतच्या तणावात भारताला मोठा यश; दोन दहशतवाद्यांनी केलं आत्मसमर्पण, दारूगोळा जप्त
पाकिस्तान आपल्या नापाक कारवायांपासून थांबलेला नाही. नेहमीच सीमेपलीकडून भारताविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र यावेळी त्यांचा एक कट अयशस्वी झाला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला भाग पाडले आहे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.