Padmashri Maruti Chittampalli : पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अरण्यऋषी नावाने होती ओळख
पद्मश्री सन्मानित, पर्यावरण आणि वन्यजीव लेखक ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ लेखक आणि माजी वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचे आज 18 जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. सोलापूरमधील त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय पर्यावरण आणि साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.