पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर INDI आघाडी फुटली; केजरीवाल आणि ममतांचे पक्ष पडले बाहेर
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर दुसऱ्यांदा, इंडिया अलायन्सचे नेते १९ जुलै (शनिवार) संध्याकाळी भेटणार आहेत. तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) त्यात सहभागी होणार नाहीत.
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर दुसऱ्यांदा, इंडिया अलायन्सचे नेते १९ जुलै (शनिवार) संध्याकाळी भेटणार आहेत. तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) त्यात सहभागी होणार नाहीत.
विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीपासून सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षाच्या सुनावणीचा निकालाबाबत दिलेल्या संकेतापर्यंत अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीनंतर अद्याप इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, युनेस्कोच्या निर्णयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत त्यांनी समाजाला आणि सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली.