Nehru government : नेहरू सरकार सरन्यायाधीशांच्या निवडीमध्ये मनमानी करत होते?
भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीवर एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करताना सरकारने सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना दोनदा दुर्लक्षित केले, त्यावेळी न्यायाधीशांच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय सरकारचा होता.