Naxals : नक्षल्यांचे कंबरडे मोडले, सर्वात मोठी कारवाई; 114 दिवसांत 161 नक्षली ठार, 600 जणांचे आत्मसमर्पण
गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंद देश नक्षलमुक्त होईल, असे जाहीर केले होते. या मोहिमेअंतर्गत यंदा आतापर्यंत ११४ दिवसांत १६१ नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. सुमारे ६०० जणांनी शरणागती पत्करली आहे. २०२४ मध्ये संपूर्ण वर्षात २९६ व २०२३ मध्ये ५६ जण मारले गेले होते. म्हणजे दोन वर्षांतच नक्षलीविरुद्ध घातक कारवाईत ५२८ टक्क्यांची वाढ झाली आहे