Sharad Pawar : शरद पवारांची सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी; मोदींना म्हणाले- राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय – प्रक्रिया राबवा
मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य आणि अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी मांडले. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्याची परिस्थिती चिंताजनक असून केंद्र सरकारने अधिक जबाबदारीने पावले उचलण्याची गरज असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.