• Download App
    mumbai | The Focus India

    mumbai

    Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले- मराठी माणसासाठी मुंबई मनपा ही शेवटची निवडणूक, रात्र वैऱ्याची… गाफील राहिलात तर निवडणूक गेलीच समजा

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणालेत की, मुंबई मनपाच्या निवडणुकीत मतदार यांद्यावर विशेष लक्ष असू द्या. मतदार याद्या तपासून पाहा. मतदार खरा की खोटा? हे तपासून पाहा. रात्र वैऱ्याची आहे… त्यामुळे गाफील राहू नका, आजूबाजूला काय सुरू आहे यावर लक्ष असू द्या.

    Read more

    काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा; शरद पवारांचा डाव काँग्रेसने बरोबर ओळखला!!

    काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा; शरद पवारांचा डाव काँग्रेसने बरोबर ओळखला!!, हे राजकीय चित्र मुंबईतून आज समोर आले.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेसने महापालिका निवडणुका स्वबळावर लढवायची घोषणा केली,

    Read more

    Shashi Tharoor : थरूर म्हणाले- 1989-90 मध्ये काश्मीरातून दहशतवाद सुरू झाला; आता दिल्ली-मुंबईपर्यंत पसरला

    काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी रविवारी सांगितले की, “१९८९-९० मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाला आणि हळूहळू मुंबई, पुणे आणि दिल्लीत पसरला. गेल्या ३० वर्षांपासून भारत दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करत आहे. आता, मजबूत आणि प्रभावी कारवाईची आवश्यकता आहे.”

    Read more

    New York Mumbai : अमेरिकन अब्जाधीश म्हणाले- न्यूयॉर्क मुंबईसारखे होईल, ममदानींच्या विजयावर चिंता व्यक्त

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : New York Mumbai  न्यूयॉर्क शहरातील एक प्रमुख रिअल इस्टेट अब्जाधीश बॅरी स्टर्नलिच्ट यांनी चिंता व्यक्त केली आहे की ममदानी यांच्या नेतृत्वाखाली शहराची […]

    Read more

    High Court, : हायकोर्टाने म्हटले- मतदान स्वातंत्र्य अन् मतदान हक्क वेगवेगळे; यादी पुनरावलोकनाच्या वेळी मतदार म्हणून नोंदणीचा हक्क

    मतदानाचे स्वातंत्र्य आणि मतदानाचा हक्क हे दोन्ही वेगवेगळे आहेत. प्रत्येक व्यक्तीने वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली, तर पडताळणीच्या कामामुळे अधिकाऱ्यांवर ताण येईल आणि अर्जांचा महापूरच येईल असे मत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले.

    Read more

    Mumbai Satya March : मुंबईत आज सत्याचा मोर्चा; महाविकास आघाडी आणि मनसेची निवडणूक आयोगाविरोधात एकजूट; काँग्रेसमध्ये मनसेसह आंदोलनावरून मतभेद

    मतदार याद्यांमधील गंभीर घोळ, मतचोरी आणि दुबार नावांवरून उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ऐतिहासिक सत्याचा मोर्चा निघणार आहे. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा काढत आहेत. सत्याचा मोर्चा, या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आंदोलनातून मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेविरोधात आवाज उठवला जाणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू दीर्घकाळानंतर एकत्र एका मंचावर दिसणार आहेत. दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणारा हा मोर्चा मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पोहोचणार आहे, जिथे नेत्यांची भाषणे होणार आहेत.

    Read more

    CM Fadnavis : फडणवीसांचा विरोधकांना इशारा- भाजप काचेच्या घरात नाही, दगड फेकू नका; पक्ष कार्यालयासाठी जागा बळकावल्याचा आरोप फेटाळला

    मुंबईतील भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या जागेवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे आमच्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नका,’ असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या पूर्वीच्या लहान कार्यालयातील अडचणी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तेथे बसून केलेली निवडणूक तयारी याची आठवण सांगितली, तसेच पक्षाने हे कार्यालय घेण्यासाठी सर्व नियम पाळून, स्वतःच्या पैशाने जागा विकत घेतल्याचे ठामपणे स्पष्ट केले.

    Read more

    Raj Thackeray : मोर्चा असा काढा की गल्ली ते दिल्लीचे लक्ष मुंबईकडे लागेल, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना निर्देश; निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

    राज्यातील विरोधकांनी आता निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार यादीतील अनियमितता, बनावट मतदार आणि आयोगाच्या निष्क्रियतेविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असून, यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंना राहुल, राऊतांचा वाण नाही, पण गुण लागला; 96 लाख खोटे व्होटर असल्याच्या आरोपावर भाजपचा पलटवार

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख बोगस मतदार असल्याच्या आरोपावर सत्ताधारी भाजपने जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत जाण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा वाण नाही, पण गुण लागला आहे. त्यांनी हे आरोप करण्यापूर्वी टीचभर तरी पुरावा द्यायला हवा होता, असे भाजपने म्हटले आहे.

    Read more

    Ramdas Athawale : राज ठाकरेंकडे भाषणे देण्याची कला, पण त्याने नेतृत्व होत नाही, रामदास आठवले यांचा निशाणा

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत भाजपवर आणि गुजरातसंबंधी धोरणांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे अदानी, अंबानीला आंदण देण्यासाठी तयार केली जात आहेत. गुजरातचा वरवंटा जेव्हा महाराष्ट्रावर फिरेल, तेव्हा भाजपला मतदान करणारा मराठी माणूससुद्धा त्यात भरडला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. याचबरोबर त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मितेच्या प्रश्नावर भावनिक इशारा दिला. राज ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे.

    Read more

    Mumbai : मुंबई एसटी बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा; गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

    एसटी को-ऑपरेटिव बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु सध्या ह्या बँके बाबत नेहमीच काही ना काही विचित्र ऐकायला येते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर मौज करत आहे. याचे अनेक उदाहरणे आजवर आपण बघितलेत.

    Read more

    ओव्यांपासून रंगभूमीपर्यंत, साहित्य, संस्कृती आणि विचारांचे वैभव; मुंबईत मराठी भाषा सप्ताह 2025 चे उदघाटन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसानिमित्त’ अभिजात मराठी भाषा सप्ताह 2025 चे उदघाटन करण्यात आले. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मायमराठीला दिलेल्या अभिजात भाषेचा बहुमानाच्या गौरवशाली निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता.

    Read more

    Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता हॉटेल्स, दुकाने आणि आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार

    राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना आता 24 तास उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाने यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी व्यवहारांना नवे बळ मिळण्याची आणि ग्राहकांना दिवस-रात्र सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

    Read more

    Bhiwandi : मुंबईच्या भिवंडीतून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक; 3 लाख रुपये पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप

    उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी रात्री उशिरापर्यंत छापे टाकून भिवंडीतून तीन तरुणांना अटक केली आहे. या तरुणांवर संशयास्पद दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून, त्यांनी सुमारे 3 लाख रुपये जमा करून पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

    Read more

    Elphinstone Bridge : 125 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलावरची वाहतूक बंद! जाणून घ्या काय आहे या पुलाचा इतिहास

        मुंबई : Elphinstone Bridge : मुंबईच्या व्यस्त मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) वरील वाहतूक काल मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद करण्यात […]

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास- सरकारचे काम सुरू झाले, आता आरक्षण नक्की, मुंबईचे मालक आम्ही!

    मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काम सुरू केले आहे. आमचे काम सुरू केले तर सरकारला आम्ही मोठेपण देऊ. तुम्ही जर आमचे कामे केले तर आम्ही सरकारचे कौतुकच करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

    Read more

    Mumbai : मुंबई उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला नोएडातून अटक; मुंबई पोलिसांना व्हाट्सॲपवर लिहिले होते- 34 वाहनांमध्ये 400 किलो RDX

    अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईला उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अश्विनी असे आहे, तो मूळचा बिहारचा आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून नोएडामध्ये राहत होता. आरोपीला नोएडाच्या सेक्टर-११३ येथून पकडण्यात आले. नंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

    Read more

    Bomb threat in Mumbai : मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी: 14 दहशतवादी, 400 किलो आरडीएक्स आणि 34 गाड्यांमध्ये ‘मानवी बॉम्ब’चा दावा; पोलिस हाय अलर्टवर

    विशेष प्रतिनिधी   मुंबई : Bomb threat in Mumbai :   गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात आणि अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुंबई शहराला पुन्हा एकदा दहशतवादी बॉम्बस्फोटाची गंभीर धमकी […]

    Read more

    Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांचा सवाल- गुलाल उधळला होता, तर जरांगे पुन्हा मुंबईत का आले? ओबीसींचे आरक्षण वाढवा!

    मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबावर आरोप करत त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. तसेच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.

    Read more

    Vikhe Patil : विनोद पाटलांवर विखे पाटलांचा पलटवार, म्हणाले- चर्चा सुरू होती तेव्हा ताजमध्ये झोपले होते!

    राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत त्यानुसार जीआर देखील काढण्यात आला आहे. परंतु, या जीआरचा टाचणी एवढाही फायदा किंवा उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही मिळणार नसल्याची टीका मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. यावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच यावेळी बोलताना विखे पाटलांनी विनोद पाटलांवर टीका देखील केली आहे.

    Read more

    Chagan Bhujbal : ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरे वाटेकरी नको; लाखोंच्या लोंढ्यांसह मुंबईत येणार, छगन भुजबळांचा इशारा

    आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही देखील लाखोंच्या लोंढ्यासह मुंबईत दाखल होणार आणि आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. तसेच ओबीसी प्रवर्गात अजून कोणत्याही जातीला आणू नका, असेही त्यांनी पत्रकार परिषदेतून म्हटले आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले- एकतर विजयी यात्रा, नाहीतर अंत्ययात्रा; आम्ही OBC सोबत जाणारच!

    सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना खडसावले आहे. यावेळी बोलताना जरांगे यांनी म्हटले की सन्मान दिला नाही तर नेते आंदोलनस्थळी यायला घाबरतील. सन्मानाने येऊ द्या आणि सन्मानाने पाठवा, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. एकतर विजयी यात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल, असेही यावेळी जरांगे म्हणाले.

    Read more

    Maratha reservation : मराठा आरक्षण आंदोलन; शिष्टमंडळासोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर राजकीय हालचालींना वेग

    मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी सरकारवरील दबाव वाढला आहे.

    Read more

    Sharad Pawar : मराठा आरक्षणावरून शरद पवारांचे केंद्राकडे बोट; ते पुजनीय,आदरणीय, वंदनीय म्हणत अजितदादांचा टोला

    मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. मराठा आरक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे, असे शरद पवारांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी, ‘ते पुजणीय,आदरणीय, वंदनीय’ असे म्हणत “मला जास्त बोलायला लावू नका,” असा टोला शरद पवारांना लगावला. यामुळे मराठा आरक्षणावरून काका-पुतणे भिडल्याचे पाहायला मिळाले.

    Read more

    Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते म्हणाले- मनोज जरांगेंना कायद्यासमोर मोठे समजू नये, आंदोलन आटोपते घेऊन त्याला त्याच्या गावी धाडा

    मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र टीका केली आहे. त्यांनी मनोज जरांगेला कायद्यापेक्षा मोठे समजू नये, असे म्हटले आहे. जरांगेचे आंदोलन आटोपते घेऊन त्याला त्याच्या गावी धाडावे, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.

    Read more