• Download App
    Mumbai political news | The Focus India

    Mumbai political news

    BJP Navnath Ban : केदारनाथ नको, औरंगजेबाच्या कबरीवर जा!:संजय राऊतांवर भाजपची सडकून टीका

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथला जाऊन आत्मचिंतन करावे, असा सल्ला दिल्यानंतर बन यांनी त्याला तीव्र प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ आता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळापेक्षाही अधिक झाला आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी गेल्या 12 वर्षांत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळे मोदींनी आत्मचिंतन करण्याची गरज नसून विरोधकांनीच आपल्या राजकारणाचा विचार करावा.

    Read more

    Bawankule : ‘फडणवीसांना दिल्लीला पाठवण्याचा अधिकार कोणाला?’ बच्चू कडूंच्या विधानावर बावनकुळेंचे रोखठोक उत्तर, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम

    महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला असतानाच भाजपने या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. शिवसेना समर्थक आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्यातील सत्तासमीकरणांबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत नेतृत्वबदलाच्या शक्यता फेटाळून लावल्या.

    Read more

    Sunil Tatkare : राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी; सुनेत्रा पवारांची जागा मिळणार, तटकरे यांनी केली घोषणा

    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी गोंदियाचे ज्येष्ठ नेते आणि प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय Rajendra Jain यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare यांनी मुंबईतील बैठकीनंतर ही घोषणा केली.

    Read more

    CM Devendra Fadnavis : अर्थखाते सुनेत्रा पवारांकडे जाणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट विधान; चर्चांना दिला पूर्णविराम

    महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थखाते सोपवले जाणार असल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. अर्थ विभाग सध्या स्वतःकडेच राहणार असून त्याबाबत कोणताही बदल प्रस्तावित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    Read more