• Download App
    maratha reservation | The Focus India

    maratha reservation

    Pankaja Munde : मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही, माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

    मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, असे विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्त्व आहे, असेही मुंडे म्हणाल्या. परळी येथे आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांची मोठी घोषणा- मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन उभारणार

    मराठा आरक्षणासाठी राज्यात रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याने, जरांगे पाटलांनी थेट भाऊबीजेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओबीसी समाजासाठी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता लक्षात घेऊन त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण विधान केले. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांची केवळ घोषणा झाली होती, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर 60 नवीन ओबीसी वसतिगृहे सुरू केली. तसेच, 10 लाख ओबीसींना हक्काची घरे दिली आणि समाजासाठी असलेली आर्थिक महामंडळेही मजबूत केली.

    Read more

    Laxman Hake : लक्ष्मण हाकेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना भावनिक पत्र- जरांगे मुखवटा, क्रूर मराठा राजकीय नेत्यांचा हेतू साध्य, स्पर्धेत मूळ ओबीसी कसा टिकेल?

    राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक झाला असून, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन आदेशामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आले असून, ओबीसी समाजाची मसलत संपल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

    Read more

    Vijay Wadettiwar : भुजबळांच्या व्हिडिओवर वडेट्टीवारांचा पलटवार; ते ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवणाऱ्या फॅक्टरीत काम करतात- विजय वडेट्टीवार

    मराठा समाजाच्या आरक्षणावरून आता ओबीसी नेत्यांची आपसातच जुंपली आहे. मराठ्यांना ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी सर्वच ओबीसी नेत्यांचे एकमत आहे. असे असले तरी दुसरीकडे ते एकमेकांना टार्गेटही करीत आहेत. शुक्रवारी बीड येथे झालेल्या ओबीसीच्या मोर्चात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवारांचा एक जुना व्हीडीओ दाखवला. त्याला शनिवारी पत्रकार परिषदेतून वडेट्टीवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil, : ओबीसी आरक्षण जाणार आहे याचे काही पुरावे आहेत का? मंत्री विखे पाटील यांचा सवाल; OBC नेत्यांना राईचा पर्वत न करण्याचा सल्ला

    मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारने 2 सप्टेंबर रोजी जारी केलेला जीआर मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसींचे आरक्षण जाणार आहे याचे काही पुरावे आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. ओबीसी आरक्षण कमी होतंय किंवा जाणार आहे अथवा कमी होणार आहे याचे काही पुरावे आहेत का? हा राईचा पर्वत का उभा राहत आहे हेच मला कळत नाही? असे ते म्हणालेत.

    Read more

    Babbanrao Taywade : वडेट्टीवारांनी भूतकाळात चूक केली, पण ती सभेत दाखवणे योग्य नव्हते, तायवाडेंचा भुजबळांना सल्ला

    मंत्री छगन भुजबळ हे समाजाचे मोठे नेते आहेत. एका प्रकारे ते वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांनी एखाद्या ओबीसी नेत्याकडून भूतकाळात झालेली चूक भर सभेत व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर आणणे योग्य नाही, भुजबळ यांनी तसे करायला नको होते, असे म्हणत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal, : ओबीसींचा कोर्टात अन् राजकारणातही विजय होईल; छगन भुजबळांनी व्यक्त केला ठाम विश्वास

    राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधत ओबीसींचा कोर्टात अन् राजकारणातही विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्य एक ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला.

    Read more

    Manoj Jarange : भुजबळ वातावरण खराब करत आहेत, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि मराठ्यांना देणार, मनोज जरांगेंचा पलटवार

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील सभेवर तीव्र आक्षेप घेत, ती ओबीसीची नव्हे, तर जिल्ह्यावर दबाव निर्माण करण्यासाठी घेतलेली आणि मराठ्यांच्या राजकीय अस्तित्वावर घाला घालणारी सभा असल्याचे म्हटले आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal : विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला; महाएल्गार सभेतून छगन भुजबळांचा हल्लाबोल

    विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या महाएल्गार सभेत बोलताना केली आहे. तसेच विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरांगेंकडे जातात. भाजपच्या लोकांना मला सांगायचे आहे की तुमच्या लोकांना आवरा. मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, म्हणाले- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आतापर्यंत झाले नाही असे आंदोलन छेडणार

    मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इथून पुढे व इथून मागे 100 वर्षांत झाले नाही असे आंदोलन उभे करणार असल्याचे ते म्हणालेत. एवढेच नाही तर कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय नोकर भरती न करण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जरांगे व सरकारमधील वाक्युद्ध एका नव्या वळणावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil, : विखे पाटलांची घणाघाती टीका- आज समाजात दुही, विसंवाद व संघर्ष; या पापाचे धनी शरद पवार

    भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर प्रखर टीका केली आहे. समाजा-समाजात आज दुही, विसंवाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे. त्या पापाचे धनी शरद पवारच आहेत, अशी टीका विखे पाटलांनी केली आहे. तसेच 1994 साली जर शरद पवारांनी मराठा समाजाचा समावेश केला असता, तर आजची परिस्थिती नसती, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- अजित पवारांनी साप पोसलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप

    ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज थेट आणि गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाला लहान भाऊ मानणाऱ्या मराठ्यांविरोधात भुजबळ यांनी विनाकारण एक ‘टोळी’ निर्माण केली असून, या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावर शत्रुत्वाची भूमिका पार पाडत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षाचे जास्त नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करतात, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही साप पोसले आहे, एक दिवस तुम्हाला आमचा शब्द खरा वाटेल, असा इशाराही मनोज जरांगेंनी अजित पवारांना दिला.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- छगन भुजबळांमुळे ओबीसींचे वाटोळे होणार; जातीवाद डोक्यात असल्याने मराठ्यांवर अन्याय केला

    मराठा आरक्षणाच्या जीआरवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू आहेत. भुजबळ यांनी जरांगे यांच्या ‘अभ्यास’, ‘शिक्षण’ आणि ‘मराठ्यांचे नेतृत्व’ यावर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर, आता मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांवर तीव्र टीकास्त्र सोडले आहे.

    Read more

    Maratha reservation : मोठी बातमी : 2 सप्टेंबरच्या मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

    राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता. या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या होत्या. याचिकांकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

    Read more

    Manoj Jarange Patil, : मनोज जरांगे यांची टीका- छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा अलीबाबा; ओबीसींचा खरा घात ओबीसी नेत्यांनीच केला

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भुजबळांचा उल्लेख येवल्याचा अलीबाबा म्हणून केला. विजय वडेट्टीवार सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर जे काही बोलत आहेत, ते छगन भुजबळांचे शब्द आहेत. या लोकांनीच ओबीसींच्या खऱ्या जाती संपवल्यात. ओबीसींनी यावर चिंतन केले पाहिजेत. या लोकांनीच त्यांचा खरा घात केला आहे, असे ते म्हणालेत.

    Read more

    Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार म्हणाले- सर्व काही एकाच समाजाला, तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल

    एकाच समाजाला सर्व काही पाहिजे. EWS पाहिजे, ओबीसी पाहिजे, आणि एसईबीसीमधून पाहिजेत. त्यांना सारथी-मधून फायदा पाहिजे महाज्योतीमधूनही फायदा पाहिजे. मग बाकीच्यांनी जगायचे का नाही? जरांगे पाटील यांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकावे. ही जी सत्तेची दादागिरी आहे आणि हे बरोबर नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

    Read more

    prakash ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले- धनगर समाजाने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व करावे; आरक्षणवादी जनतेला सोबत घ्या, सवर्णांना मतदान करू नका

    ओबीसी लढ्याचे नेतृत्व धनगर समाजाने हाती घ्यावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. आगामी निवडणुकीत ओबीसीने आरक्षणवादी जनतेला सोबत घेऊन निवडणूक लढवावी, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच सवर्णांना मतदान करण्याऐवजी एससी-एसटी उमेदवारांना आणि ते नसतील तर मुस्लिमांना मतदान करावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले. धनगर समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज पुण्यात पार पडले. या अधिवेशनात प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. या अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

    Read more

    पराभूत निजामाने तयार केलेले गॅझेट मराठा आरक्षणासाठी स्वीकारण्याचे कारण काय??; खासदार शाहू महाराजांचा परखड सवाल

    निजामाला मराठ्यांनी तीन वेळा पराभूत केले, त्या निजामाने गॅझेट तयार केले, पण ते मराठा आरक्षणासाठी स्वीकारण्याचे कारणच काय??, असा परखड सवाल काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांनी आज केला. या एका सवालातून शाहू महाराजांनी मनोज जरांगे यांना बॅकफूटवर ढकलले.

    Read more

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले- उद्या निवडणुका लागल्या तरी आम्ही सज्ज, ठाकरे बंधू, आरक्षणाचा तिढा, निवडणुकांवरही भाष्य

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, यावर चर्चांना उधाण आले असताना फडणवीस यांनी यावर भाष्य करताच चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. माझ्यावर पक्ष फोडल्याचे आरोप केले जातात. पण जर कोणी म्हटले की, मी ठाकरे बंधूंना एकत्र केले, तर त्याचे श्रेय घेण्यास मला आनंदच वाटेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रीकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका मांडली.

    Read more

    Pankaja Munde : आरक्षणाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या- हा संघर्ष नैसर्गिक, राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घ्यावा

    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप नेत्या तथा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या संघर्षावर महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. आरक्षणावरील संघर्ष हा नैसर्गिक आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Vijay Wadettiwar : ओबीसी समाजावर लढो किंवा मरोची वेळ; मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे संघर्ष पेटला, विजय वडेट्टीवार आक्रमक

    ओबीसी समाजावर लढो या मरो-ची परिस्थिती आली आहे. आतापर्यंत ओबीसींच्या 7 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप आहे. दोन समाज आमने-सामने आले आहेत. मराठवाड्यात तर अनेक गावांमध्ये मराठा-ओबीसी वाद सुरू आहे हे सर्व सरकारचे पाप आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

    Read more

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    मराठा आरक्षणात हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसंदर्भातील शासन निर्णयाला (जीआर) आव्हान देणारी पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. याचिकाकर्ता पीडित व्यक्ती नाही आणि याचिकेतून जनहितही स्पष्ट होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने या वेळी नोंदवले. ज्यांना जीआरवर आक्षेप असेल त्यांनी वैयक्तिक रिट याचिका दाखल करावी, असा पर्यायही न्यायालयाने सुचवला.

    Read more

    Bhujbal : भुजबळ यांनी व्यक्त केली शंका- आज जारी झालेली कुणबी प्रमाणपत्रं योग्य आहेत का? ती 2 सप्टेंबर आधी शोधली होती का?

    राज्य सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मराठा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले. पण आता मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या प्रमाणपत्रांवर शंका व्यक्त केली आहे. आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र योग्य आहेत का? या प्रमाणपत्रांच्या नोंदी 2 सप्टेंबरपूर्वी शोधल्या होत्या का? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत.

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा ‘चलो दिल्ली’चा नारा; मराठा समाजाचे अधिवेशन राजधानीत घेण्याची घोषणा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जीआर काढला. हा मराठा समाजासाठी मोठा विजय मानला जात आहे. तसेच राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे. आता मनोज जरांगे यांनी राजधानी दिल्लीत जाणार असल्याची घोषणा केली आहे.

    Read more