Kalpanaraje Bhonsle : मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकणे धोक्याची घंटा, NCERTच्या निर्णयावर कल्पनाराजे भोसलेंचा संताप
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. “मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे ही धोक्याची घंटा असून, हे असेच चालत राहिले तर भविष्यात शिवरायांच्या इतिहासावर पडदा पाडण्याचा प्रयत्न होईल,” अशी भीती राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.