Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा दिला इशारा!
महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा उसळी घेणार असल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी दीर्घकाळ सक्रिय असलेले मनोज जरांगे आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. जर लवकरच तोडगा निघाला नाही तर राज्यभर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. शिवाय मंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या भेटीत जरांगे यांनी हे सांगितले.