Manipur : मणिपूरमध्ये भाजप आमदारांचा सरकार स्थापनेचा दावा; राज्यपालांकडे 10 आमदार गेले, 44 जणांच्या पाठिंब्याचा दावा
मणिपूरमध्ये बुधवारी १० आमदारांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. यापैकी भाजपचे ८ आमदार, एनपीपीचा प्रत्येकी एक आणि एक अपक्ष आहे. त्यांनी 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या ६० जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ३१ आहे.