Nitish Kumar : कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून ‘जेडीयू’ने साधला ममता बॅनर्जींवर निशाणा
कोलकाता येथील एलएलबी विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी (३० जून २०२५) जेडीयू नेते नीरज कुमार यांनी या प्रकरणावर म्हटले की, केवळ आरोपीला अटक करणे हीच सरकारची जबाबदारी नाही. कारण तो एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे, म्हणून तृणमूल काँग्रेसने केवळ शिस्तभंगाची कारवाई करावी असे नाही तर जनतेची अपेक्षा आहे की तुम्ही वेळेच्या आत आरोपपत्र निश्चित करावे. जलदगतीने खटला चालवा, जेणेकरून न्याय मिळण्याची आशा अबाधित राहील.