• Download App
    maharashtra | The Focus India

    maharashtra

    Fadnavis : बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही; फडणवीस यांचा ठाकरेंच्या टीकेवर पलटवार

    उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली होती. मराठी माणसांची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकांचे नोकर भेटीगाठी घेत आहेत,

    Read more

    Minister Bhuse : ​​​​​​​हिंदी सक्तीवर सरकारचे स्पष्टीकरण; पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना इच्छेनुसार तिसरी भाषा- शिक्षण मंत्री दादा भुसे

    पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या सरकारच्या वादग्रस्त निर्णयाचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणी एक पाऊल मागे घेतले आहे. या प्रकरणी त्यांनी सद्यस्थितीत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणालेत.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे हिंदीच्या सक्तीवर आक्रमक; सरकारला हिंदी शिकवून दाखवण्याचे आव्हान; सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र

    आपण हिंदू आहोत हिंदी नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी भाषेची शक्ती दक्षिण भारतातील राज्यात कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आज भाषा सक्ती करत आहात, उद्या इतरही सक्ती होऊ शकते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकावला जाईल, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी सरकारला दिलेली पत्र देखील त्यांनी वाचून दाखवले. तसेच त्यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिले असून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. या निर्णयामागे आयएएस लॉबी असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- राज ठाकरेंचा दोन भाषांचा आग्रह चुकीचा, देशात 3 भाषांचे सूत्र

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचे ठणकावून सांगितले. संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) 3 भाषांचे सूत्र लागू असेल, तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, असे ते म्हणालेत.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात आता हिंदी अनिवार्य भाषा नसणार; मुलांना तृतीय भाषा निवडण्याचा अधिकार, पण…

    महाराष्ट्रात हिंदीसाठी अनिवार्य हा शब्द काढून टाकण्यात आला आहे परंतु मराठी आणि इंग्रजीनंतर ती तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवण्याबाबत अनिवार्य हा शब्द मागे घेण्यात आला आहे, परंतु सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.

    Read more

    महाराष्ट्रात सुमारे 11.70 लाख हेक्टरवर पेरण्या, पाऊस चांगला होण्याची अपेक्षा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या मंत्रिमंडळ बैठकीची सुरुवात अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर राज्यातील पावसाळी परिस्थितीचा आणि खरीप हंगामातील पेरणी प्रगतीचा आढावा घेण्यात आला

    Read more

    Maharashtra Municipal Election : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची तयारी सुरू – १४ वर्षांपूर्वीचीच प्रभागरचना पुन्हा लागू

    राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले असून, ती २०११ च्या जनगणनेच्या आधारावर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात २०१७ मध्ये अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसारच नव्याने काही किरकोळ बदल करून ती रचना पुन्हा लागू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया सुरु केली असून, या प्रभाग रचनेवर आधारित निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.

    Read more

    Maharashtra महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट; वाचा मुख्यमंत्र्यांचे नीती आयोगाच्या बैठकीत भाषण

    राजधानी दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रातील पाच हजारांहून अधिक पाकिस्तानी, बहुतांश नागपुरात!

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात राहणारे पाकिस्तानी नागरिक परत येत आहेत. पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीयांचीही अशीच परिस्थिती आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, भारतातील सर्व राज्यांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची झडती घेतली जात आहे. राज्य सरकारे त्यांच्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा डेटा शेअर करत आहेत.

    Read more

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात

    महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रातील 10 हजार गरजू महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप केले जाणार आहे. नागपूर येथून दिनांक 20 एप्रिल रोजी गरजू महिलांना सवलतीच्या दरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

    Read more

    Maharashtra : सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र सज्ज!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डी. बी. नगर (दक्षिण मुंबई), वरळी (मध्य मुंबई) आणि गोवंडी (पूर्व मुंबई) येथे अत्याधुनिक सायबर प्रयोगशाळांचे उदघाटन करण्यात आले. महिलांविरोधातील सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, बँक हॅकिंग, मोबाइल व डेटा टेम्परिंगसारख्या गुन्ह्यांच्या जलद व अचूक तपासासाठी या प्रयोगशाळा क्रांतिकारी ठरणार आहेत.

    Read more

    Maharashtra : औष्णिक केंद्रातील राखेच्या वितरणासाठी महाराष्ट्राचे आता नवे धोरण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात औष्णिक केंद्रातील राखेच्या विक्रीसंदर्भात नव्या सर्वंकष धोरणाची घोषणा केली. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सध्या 100 टक्के लिलावाची अंमलबजावणी होत असली तरी स्थानिक उद्योगांना प्राधान्य देऊन त्यांचावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

    Read more

    Maharashtra महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे ‘टायकॉन मुंबई 2025 : इंडियाज लिडिंग आंत्रप्रेन्युअरल लीडरशिप समिट’ कार्यक्रम संपन्न झाला.

    Read more

    पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर 1; फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात तरतुदी कुठल्या, किती आणि कशा??

    पायाभूत सुविधा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल नंबर वरच राहिला असून फडणवीस सरकारच्या 2025 – 2026 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी भरघोस तरतूद केली आहे.

    Read more

    Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला मान्यता

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

    Read more

    Maharashtra : प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी!

    केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते बालेवाडी, पुणे येथे झालेल्या ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

    Read more

    महाराष्ट्रात love jihad विरोधात कायदा का??; फडणवीसांनी सांगितले दाहक वास्तव आणि कायद्याची गरज!!

    महाराष्ट्रात love jihad विरोधी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केल्यानंतर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांच्या नेत्यांनी आगपाखड केली.

    Read more

    ठाकरे + काँग्रेसच्या टोकाच्या विरोधापोटी महाराष्ट्राच्या राजकारणात पिकवली जातेय विश्वासघाताची पोळी!!

    उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या टोकाच्या विरोधापोटी महाराष्ट्राच्या राजकारणात पिकवली जातेय विश्वासघाताची पोळी!!, हे सत्य स्वीकारण्याची वेळ महाराष्ट्रातल्या दोन दिवसात मधल्या घडामोडींनी आली. शरद पवारांनी राजधानी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव केला. पवारांनी हा बाण भाजपच्या दिशेने सोडला होता, पण त्यामुळे उद्धव ठाकरेंची सेना घायाळ झाली. संजय राऊत यांनी उतावीळपणे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच शरद पवार यांना “टार्गेट” केले. शरद पवारांच्या समर्थकांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. फक्त सुषमा अंधारे संजय राऊत यांच्या बाजूने उभ्या राहिल्या.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात GB सिंड्रोमचे 163 रुग्ण; 21 व्हेंटिलेटवर, 47 रुग्ण आयसीयूमध्ये

    महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे पाच नवीन रुग्ण आढळले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर भागात त्यांची संख्या 163 पर्यंत वाढली आहे. मृतांचा आकडाही 5 वर पोहोचला आहे. आतापर्यंत देशातील 5 राज्यांमध्ये गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण आढळले आहेत.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात GB सिंड्रोममुळे आतापर्यंत 5 बळी; आसाममध्ये 17 वर्षीय मुलीचा मृत्यू

    देशातील 5 राज्यांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्ण आढळले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील इतर भागात त्यांची संख्या 149 झाली आहे. मृतांचा आकडाही 5 वर पोहोचला आहे.

    Read more

    कुणी जाहीरपणे सांगून महाराष्ट्रात खरा राजकीय भूकंप घडणार आहे का??

    महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊन प्रचंड बहुमतानिशी भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या महिना – दीड महिन्यात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याच्या बातम्यांचे पेव फुटले. या बातम्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतून खतपाणी घातले गेले.

    Read more

    Maharashtra : दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका, १५.७० लाख कोटी रुपये गुंतवणूक, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती

    दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने इतिहास घडला आहे. दोन दिवसात १५.७० लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. या गुंतवणुकीतून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल.Maharashtra

    Read more

    Maharashtra महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोर आता रडारावर, तक्रारींनंतर सरकार कारवाईत

    बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. खरंतर, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बनावट जन्म आणि मृत्यु प्रमाणपत्रे उशीरा दिल्या जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात बांगलादेशींची ‘घरोघरी’ झडती घेतली जाणार!

    सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर महाराष्ट्रात बांगलादेशींची घरोघरी जाऊन झडती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक आयोगाने असे म्हटले आहे. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितले आहे की, अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये २५/२५ लोकांच्या समित्या स्थापन करत आहे. ही समिती पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने घरोघरी जाऊन बांगलादेशींचा शोध घेईल आणि त्यांना शिक्षा करेल

    Read more