Maharashtra : सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र सज्ज!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डी. बी. नगर (दक्षिण मुंबई), वरळी (मध्य मुंबई) आणि गोवंडी (पूर्व मुंबई) येथे अत्याधुनिक सायबर प्रयोगशाळांचे उदघाटन करण्यात आले. महिलांविरोधातील सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, बँक हॅकिंग, मोबाइल व डेटा टेम्परिंगसारख्या गुन्ह्यांच्या जलद व अचूक तपासासाठी या प्रयोगशाळा क्रांतिकारी ठरणार आहेत.