• Download App
    Maharashtra Political Crisis 2026 | The Focus India

    Maharashtra Political Crisis 2026

    Fadnavis : अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे:आम्हाला न सांगता विलीनीकरणाची चर्चा करतील का? – देवेंद्र फडणवीस

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. “दोन्ही पक्ष १२ फेब्रुवारीला एकत्र येणार होते,” या शरद पवार आणि जयंत पाटील यांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढला आहे. “अजित पवार भाजपशी चर्चा केल्याशिवाय विलीनीकरणाचा निर्णय घेतील का?” असा थेट सवाल करत, राष्ट्रवादीने असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भाजपशी चर्चा करणे आवश्यक असल्याची ‘अट’ मुख्यमंत्र्यांनी घातली आहे.

    Read more

    Rohit Pawar : अजितदादांचा तेरावा झाल्यावरच राजकीय चर्चा, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल माहिती नव्हते, रोहित पवार यांची प्रतिक्रिया

    राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी पक्षात व पवार कुटुंबात देखील अनेक हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. परंतु, या सगळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार सावध भूमिका घेताना दिसत आहे. तसेच त्यांनी अजितदादांचा तेरावा होईपर्यंत कुठलेही राजकीय भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

    Read more