Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसह 9 जणांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणार; आज सभागृहात निरोप, 13 मे रोजी टर्म होणार पूर्ण
महाराष्ट्र विधानपरिषदेतील राजकीय समीकरणे आता बदलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेच्या एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ येत्या १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर, आज या सर्व सदस्यांना सभागृहात अधिकृतपणे निरोप दिला जाणार आहे. हे सर्व सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिले गेले होते.