Nitesh Rane : महायुतीच्या नावावर कमळ पाडणाऱ्यांना सोडणार नाही; अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलीय, नीतेश राणेंचा बंडखोरांना इशारा
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असले तरी, अंतर्गत गटबाजीवरून राजकीय वातावरण तापले आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सिंधुदुर्गाच्या जनतेने विश्वास दाखवला आहे, मात्र काही लोकांनी महायुतीत राहूनच ‘कमळ’ पाडण्याचे काम केले,” असा खळबळजनक आरोप मंत्री आणि आमदार नितेश राणे यांनी केला आहे. विशेषतः सावंतवाडी येथील बंडखोर अपक्षांच्या मुद्द्यावरून त्यांनी स्वपक्षातील आणि महायुतीतील काही नेत्यांना जाहीर इशारा दिला आहे.