CM Fadnavis : आखाती देशांत अडकलेल्या लोकांना आणण्याचे प्रयत्न सुरू:फडणवीस म्हणाले- देशात तेलाचा 2 महिन्यांचा स्टॉक, किमती वाढणार नाहीत
केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार संवेदनशील आहे. अतिशय विपरित परिस्थितीचा सामना करत लोकांना मायदेशी आणले जात आहे. महाराष्ट्रातील लोकांनाही परत आणले जात आहे. याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांना दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.