• Download App
    Maharashtra Government | The Focus India

    Maharashtra Government

    Gopinath Munde : राज्य सरकारची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा ऑनलाइन लाभ, महाडीबीटी पोर्टलवर करता येणार अर्ज

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन मिळणार आहे. यापूर्वी हा लाभ केवळ ऑफलाइन मिळत होता. पण आता नव्या निर्णयानुसार तो ऑनलाइन मिळेल. त्याचा लाभ राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळेल.

    Read more

    SC ST Atrocity : एससी, एसटी अत्याचारातील मृत व्यक्तीच्या वारसाला 90 दिवसांतच सरकारी नोकरी, शासनाची नवी कार्यपद्धती जाहीर

    राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत खून किंवा अत्याचारामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणांमध्ये दिवंगत व्यक्तीच्या एका वारसास ९० दिवसांत गट-क किंवा गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय नोकरी देण्याची कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे. तब्बल ९ वर्षे प्रलंबित ८८९ प्रकरणांत या निर्णयामुळे नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.

    Read more

    Mumbai Redevelopment : मुंबई पुनर्विकासाला गती; 600 चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

    मुंबईतील पुनर्विकास प्रक्रियेतील भाडेकरूंना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासादरम्यान नवीन इमारतीत जागा मिळणाऱ्या भाडेकरूंना आता नोंदणी फीपासून पूर्ण सवलत देण्यात येणार आहे. आतापर्यंत 400 चौरस फुटापर्यंत ही सवलत लागू होती. मात्र यामध्ये मोठा बदल करत सरकारने मर्यादा थेट 600 चौरस फुटांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार असून पुनर्विकास प्रक्रिया अधिक गतीने होण्याची शक्यता आहे.

    Read more

    Maharashtra Govt : आमदार-खासदार कार्यालयात आल्यास अधिकाऱ्यांनी उभे राहावे, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना

    आमदार किंवा खासदार कार्यालयात भेट देण्यासाठी आल्यावर जागेवरून उठून उभे राहा, त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि फोनवर बोलतानाही नम्र भाषेचा वापर करा, अशा नवीन मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सरकारने गुरुवारी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी जारी केल्या. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही शासन निर्णयातून देण्यात आला आहे.

    Read more

    SC OBC Reservation : OBC आरक्षण सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला सूचना- उमेदवारी अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करा!

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २७ टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट असेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारला दिले. ओबीसी आरक्षणाविषयी काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विनंती केल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती एन कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी २५ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.

    Read more

    State Government : राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय- जिल्हा बँकांमध्ये आता ‘ऑनलाईन’ भरती; भ्रष्टाचाराला बसणार आळा

    राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकरभरती प्रक्रियेवर अनेकदा अपारदर्शकतेचे आणि पैशांच्या व्यवहाराचे प्रश्न उपस्थित केले जात होते. या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या बँकांमधील भरती प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

    Read more

    Maharashtra Government : राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचे डिजिटायझेशन, सर्व नोंदी एका क्लिकवर

    राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी सर्व नोंदी पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत ‘महा ई-ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम’ या नव्या प्रणालीअंतर्गत प्रशासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांच्या भौतिक सेवापुस्तिकांचे डिजिटायझेशन करण्यास सुरुवात करत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे नियुक्तीपासून सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व सेवाविषयक व्यवहार एकाच प्रणालीद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होतील.

    Read more

    Maharashtra Government : शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपये अनुदान; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली माहिती

    शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. या संदर्भात माहिती देताना भरणे म्हणाले, जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषि विभागामार्फत आयोजन केले जाते, अशी माहिती भरणे यांनी दिली आहे.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : जमीन मोजणी आता 120 ​​​​​​​दिवसांऐवजी 30 दिवसांत; 3.12 कोटी प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार

    जमिनीच्या व्यवहारांसाठी सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवणाऱ्या आणि भूमी अभिलेख विभागाच्या ‘धीम्या’ गतीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ‘क्रांतिकारी’ बातमी आहे! महसूल विभागाने ‘जनहित’ साधणारा ऐतिहासिक निर्णय घेत, जमिनीच्या मोजणीचा निपटारा करण्यासाठी लागणारा १२० दिवसांचा दीर्घ कालावधी थेट केवळ ३० दिवसांवर आणला आहे.

    Read more

    Bawankule : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह; जागा निश्चितीसाठी 28 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम

    राज्यातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना निवास आणि अभ्यासासाठी योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून वसतिगृह उभारणीसाठी जागा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

    Read more

    Maratha reservation : मोठी बातमी : 2 सप्टेंबरच्या मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

    राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता. या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या होत्या. याचिकांकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

    Read more

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा: तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

    पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारच्या वतीने पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    Read more

    Chhagan Bhujbal :लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीची कमतरता; मंत्री भुजबळांनी म्हटले- अनेक गोष्टी करता येणार नाहीत

    राज्यात आर्थिक ओढाताण अधिक तीव्र होत चालली असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजना, आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी यांसारख्या योजनांवरील निधीअभावाची स्पष्ट कबुली दिली आहे. “लाडकी बहीण योजना 35 ते 40 हजार कोटी रुपयांवर जाते, त्यामुळे काही गोष्टी यंदा करता येणार नाहीत,” असे सांगत भुजबळ यांनी सरकारच्या आर्थिक मर्यादांचा उल्लेख केला. निधीअभावामुळे योजनांमध्ये ओढाताण होणार असल्याचेही भुजबळ म्हणालेत.

    Read more

    Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता हॉटेल्स, दुकाने आणि आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार

    राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना आता 24 तास उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाने यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी व्यवहारांना नवे बळ मिळण्याची आणि ग्राहकांना दिवस-रात्र सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

    Read more

    Maharashtra Govt : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराचे नवे नियम; महाराष्ट्र शासनातर्फे निर्देश जारी

    सोशल मीडियाचा वापर सर्वत्रच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर लोक आपले खासगी आयुष्यातील क्षण तसेच फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. परंतु, आता महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापरासाठी काही नियमावली व महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने (GAD) नुकतेच हे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामुळे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला सरकारवर टीका करणे किंवा धोरणांबद्दल नकारात्मक टिप्पणी करणे महागात पडणार आहे.

    Read more

    Maharashtra : मंदिर-धर्मादाय संस्था आता म्युच्युअल फंड, ETF, कॉर्पोरेट बॉण्ड्समध्ये 50% निधी गुंतवू शकणार, राज्य सरकारची परवानगी

    महाराष्ट्र सरकारने राज्यातील सार्वजनिक ट्रस्टसाठी मोठी आर्थिक क्रांती घडवणारा निर्णय नुकताच घेतला गेला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, आता सार्वजनिक ट्रस्ट त्यांच्या निधीपैकी 50 % पर्यंत रक्कम म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF), कॉर्पोरेट बॉण्ड्स आणि इतर सध्याच्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवू शकतात.

    Read more

    Devanand Sonatakke : बारमध्ये मद्य पिऊन शासकीय फायलींवर सह्या; चामोर्थीच्या उपविभागीय अभियंत्यावर निलंबनाची कारवाई

    नागपूरमधील एका बारमध्ये बसून सरकारी फायलींवर सह्या करताना आढळलेल्या अधिकाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के याच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

    Read more

    CM Fadnavis : महाराष्ट्र सरकारतर्फे दिव्या देशमुखचा सन्मान करू; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- फायनलमध्ये दोन्ही खेळाडू भारतीय असल्याचा अभिमान

    नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकला आहे. अंतिम फेरीत टाय-ब्रेक फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीला पराभूत करून तिने हे विजेतेपद पटकावले. विश्वविजेतेपद मिळवण्यासोबतच ती भारताची 88 वी ग्रँडमास्टर देखील बनली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखचे कौतुक केले आहे.

    Read more

    Anjali Damania : अंजली दमानियांचे राज्य सरकारला आवाहन- धनंजय मुंडे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत; पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका

    माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषि खात्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी मिळालेल्या कथित क्लीनचिटवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे हे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका, असे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला बजावले आहे. त्यांनी

    Read more

    Fadnavis : JNUमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे भाषण: मराठीचा अभिमान, शिवरायांचे सामर्थ्य आणि भाषावादावर ठाम मत

    दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा आणि शिवरायांच्या सामरिक शिक्षणावर आधारित दोन महत्त्वपूर्ण केंद्रांचे उद्घाटन केले. या वेळी दिलेल्या भाषणात त्यांनी मराठी भाषा, इतर भारतीय भाषांचे महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे सामरिक विचार आणि सध्या सुरू असलेल्या भाषावादावर सखोल भाष्य केले. भाषणात त्यांनी भाषा, संस्कृती आणि अभिमान यांचे समतोल साधताना एक समंजस, पण ठाम भूमिका मांडली.

    Read more

    Maharashtra government : महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण धोरण जाहीर : विद्यार्थी, ज्येष्ठांच्या गृहप्रकल्पांना मुद्रांक, एफएसआयमध्ये सवलत

    राज्य सरकारने सुमारे १८ वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण- २०२५ जाहीर केले. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईत मराठी माणसासाठी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. ते पाळले गेले नाही. मात्र, या धोरणानुसार विद्यार्थी, ज्येष्ठांच्या गृहप्रकल्पांना मुद्रांक शुल्क तसेच एफएसआयमध्ये (चटई क्षेत्र निर्देशांक) सवलत दिली जाणार आहे.

    Read more

    Mumbai 2006 Blasts : 2006 मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींच्या सुटकेविरुद्ध सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; 24 जुलैला सुनावणी

    २००६च्या मुंबईतील साखळी ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात महाराष्ट्र सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीसाठी अपील केले होते.

    Read more

    Mahayuti Govt : महायुती सरकारची मोठी घोषणा- पंढरपुरातील 213 सफाई कामगारांना 600 चौरस फुटांची घरे

    सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामांचा समावेश आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर शहरातील 213 सफाई कामगारांना प्रत्येकी 600 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील. त्यासाठी 55 कोटी 61 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.

    Read more

    Liquor Price : मद्य महागले! महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्कात केली वाढ; मद्यप्रेमींना आर्थिक फटका

    महाराष्ट्रातील मद्यप्रेमींसाठी एक मोठी आर्थिक झळ ठरणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मद्याच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, उत्पादन शुल्कात (Excise Duty) वाढ केली आहे. त्यामुळे आता देशी दारूपासून ते विदेशी प्रीमियम ब्रँडपर्यंत सगळ्याच मद्य प्रकारांची किंमत वाढणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत भर पडणार असली तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण येणार आहे.

    Read more

    Maharashtra government : महाराष्ट्र सरकारकडून ‘शिवसृष्टी’साठी 50 कोटींच्या निधीची घोषणा!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यातील आंबेगाव येथे ‘शिवसृष्टी’च्या द्वितीय चरणाचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत संबोधित केले.

    Read more