Manoj Jarange Patil : ‘मराठा-कुणबी’ स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा; मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा, मनोज जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मराठा समाजाच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी आणि समाजाच्या सुख-दुःखाकडे पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी राज्यात स्वतंत्र ‘मराठा आणि कुणबी’ मंत्रालय स्थापन करावे, अशी आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धाराशिव येथे भीम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.