Maharashtra Farmer : शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग; राज्य सरकारने जिल्हानिहाय समित्या जाहीर केल्या, ६ जुलैपर्यंत पात्र शेतकऱ्यांची यादी तयार होणार
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने जिल्हा आणि तालुकास्तरावरील समित्यांची घोषणा केली असून आता प्रत्यक्ष प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. सरकारने या समित्यांना ६ जुलैपर्यंत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.