Devendra Fadanavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- बंगालमध्ये महापरिवर्तन; भाजपचा विजय भारतात होणारी घुसखोरी अन् हल्ल्यांपासून वाचवणारा
आज पश्चिमन बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. तसेच बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिले की बंगालचा खरा पक्ष कोणता आहे, असे म्हणत ममता बॅनर्जी यांना टोला लगावला आहे.