Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; राष्ट्रीय आरोग्य अभियानात 10 वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मंगळवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 वर्षे पूर्ण होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारने राज्यातील आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. आरोग्य सुविधांच्या या विकेंद्रीकरणाचाही जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.