CM Devendra Fadnavis : राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही:पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरकसपणे फेटाळून लावला आहे. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही. माध्यमांनी काही शहरांत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त दिले. त्यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठ्या रांगा लागल्या. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार भविष्यातील स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे ते म्हणालेत.