Wadettiwar : जरांगेंचे उपोषण संपल्यानंतर राजकारण तापले; ‘डबल ढोलकी सरकार’ म्हणत वडेट्टीवारांचा हल्लाबोल, हाकेंकडूनही तीव्र टीका
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले बेमुदत उपोषण अवघ्या १५ तासांत मागे घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडले असले,