CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- राज्यासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न; ऊर्जेच्या स्रोतांमध्ये परिवर्तन आवश्यक; ‘फ्लेक्स-इंजिन’नंतर सीएनजी मोठा बदल
सध्या जगासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न असून, याचे थेट परिणाम मराठवाड्यात जाणवत आहेत. यंदा मे महिन्यात पावसाळा सुरू होऊन ऑक्टोबरमध्येही पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी सात-सात वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, केवळ पिकेच नव्हे तर जमिनीही खरडून गेल्यामुळे रबीचे पीक घेणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन आणि ग्रीन हाऊस गॅसेस कमी करणे अत्यावश्यक असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.