Dhar Bhojshala : धारच्या भोजशाळेत पहिला शुक्रवार ठरला ऐतिहासिक; नमाज नाही, अखंड पूजा सुरू, आता पुढे काय?
मध्य प्रदेशातील बहुचर्चित भोजशाळा-कमाल मौला संकुल प्रकरणात उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पहिला शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा ठरला. गेली दोन दशके सुरू असलेली व्यवस्था बदलल्यानंतर प्रथमच येथे शुक्रवारची नमाज झाली नाही, तर मोठ्या संख्येने हिंदू भाविकांनी पूजा-अर्चा आणि महाआरतीत सहभाग घेतला. यामुळे भोजशाळा वादाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे.