Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने रचला नवा विक्रम, कसोटीत 5 बळी घेताच 9 गोलंदाजांना टाकले मागे
IND विरुद्ध ENG: लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 बळी घेत एक नवा विक्रम रचला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने 471 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड पहिल्या डावात 465 धावांवर कोसळले. टीम इंडियाला फक्त 6 धावांची आघाडी मिळाली. त्याच वेळी, बुमराहने 24.4 षटकांत 83 धावा देत 5 बळी घेतले.