भारताची सीमा पाकिस्तानच्या आत 150 किलोमीटर पर्यंत खोलवर घुसेल, पुढच्या 5 वर्षांत मोठ्या उलथापालथी; संघ नेते इंद्रेश कुमारांचे भाकित!!
पुढच्या पाच वर्षांमध्ये जागतिक पातळीवर मोठ्या उलथापालथी घडून भारताची सीमा सध्याच्या पाकिस्तानच्या आतमध्ये 150 किलोमीटर पर्यंत खोलवर घुसेल, असे खळबळजनक आणि गंभीर भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी शिमला मधल्या पत्रकार परिषदेत केले. संघाच्या वरिष्ठ नेत्याने एवढे थेट भाकीत केल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटलेत.