Indian government : भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिला मोठा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय!
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यापासून, भारत सरकार सतत अॅक्शन मोडमध्ये आहे. दुसरीकडे, लष्करालाही पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले होते. पाकिस्तानी नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत भारत सोडून पाकिस्तानात जाण्यास सांगण्यात आले होते. तथापि, भारत सरकारने १ मे रोजी अटारी आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याच्या निर्णयावर पाकिस्तानी नागरिकांना दिलासा दिला आहे.