Commonwealth Games : 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारत बोली लावणार; मंत्रिमंडळाची मंजुरी, अंतिम मुदत 31 ऑगस्ट
२०३० मध्ये अहमदाबादेत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत दावा करणार आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने बोली प्रस्तावाला मान्यता दिली. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी भारतीय ऑलिंपिक संघटनेने (IOA) याला मान्यता दिली होती. आता भारताला ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम बोली प्रस्ताव सादर करावा लागेल. यजमानपद द्यायचे की नाही हे नोव्हेंबरच्या अखेरीस ठरवले जाईल.