टी-20 विश्वचषकात भारत-पाक सामना होणार नाही; पाकिस्तान सरकारची घोषणा; बांगलादेशच्या समर्थनार्थ 15 फेब्रुवारीच्या मॅचवर बहिष्कार
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नाही. दोन्ही संघ 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये एकमेकांशी भिडणार होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला स्पर्धेत प्रवेश दिला होता. याच्या निषेधार्थ पाकिस्तानने भारताच्या विरोधात सामन्यावर बहिष्कार टाकला.