India Rejects Bangladesh : बांगलादेशविरुद्ध कटाचे दावे भारताने फेटाळले; म्हटले- आमच्या भूमीवरून कोणत्याही देशाविरुद्ध राजकारणाची परवानगी नाही
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या चिंता फेटाळून लावल्या. बांगलादेशने दावा केला होता की माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे काही कार्यकर्ते भारतात त्यांच्याविरुद्ध राजकीय कारवाया करत आहेत.