हिंदी सक्ती वरून आतापर्यंत फक्त एकाच कवीची पुरस्कार वापसी, पण मराठी माध्यमांनी दिली सगळे साहित्यिक एकवटल्याची बातमी!!
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने मागे घेतला. त्याऐवजी सुधारित आदेश काढला तरी देखील महाराष्ट्र शासनाने हिंदी भाषेची सक्ती विद्यार्थ्यांवर लादल्याचा आरोप करून मराठी कवी हेमंत दिवटे यांनी पुरस्कार वापसीची घोषणा केली.