• Download App
    Heavy Rain | The Focus India

    Heavy Rain

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा: तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

    पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारच्या वतीने पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    Read more

    Nepal : नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन दिवसांत 51 जणांचा मृत्यू; 9 जण बेपत्ता; लष्कराच्या हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू

    शुक्रवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या भूस्खलन आणि पुरामुळे नेपाळमध्ये ५१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन दिवसांत नऊ जण बेपत्ता आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूर्व नेपाळमधील इलाम जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झाले आहे, जिथे भूस्खलनात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- राज्यासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न; ऊर्जेच्या स्रोतांमध्ये परिवर्तन आवश्यक; ‘फ्लेक्स-इंजिन’नंतर सीएनजी मोठा बदल

    सध्या जगासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न असून, याचे थेट परिणाम मराठवाड्यात जाणवत आहेत. यंदा मे महिन्यात पावसाळा सुरू होऊन ऑक्टोबरमध्येही पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी सात-सात वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, केवळ पिकेच नव्हे तर जमिनीही खरडून गेल्यामुळे रबीचे पीक घेणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन आणि ग्रीन हाऊस गॅसेस कमी करणे अत्यावश्यक असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

    Read more

    Government : पूरग्रस्तांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जिल्हा वार्षिक निधीतील पैसे खर्च करण्यास मंजुरी, शासन निर्णय जारी

    मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर, शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून आर्थिक मदत करता येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा- ओल्या दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; पुढच्या आठवड्यात निर्णय, ई-केवायसीची अट शिथिल

    महाराष्ट्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यापूर्वी राज्यात केव्हाही ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच दुष्काळ काळात लागू करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजना सध्याच्या काळात लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे ते म्हणाले. सरकारकडून करण्यात येणारी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पोहोचती केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केले.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना

    महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मराठवाडा, पश्चिम विदर्भ, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात तर अक्षरशः ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच अधिकारी वर्गाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

    Read more

    Maharashtra : राज्यातील 31 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका; 37 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित, सरकारकडून आकडेवारी जाहीर

    राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, राज्य सरकारने नुकतीच नुकसानीची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

    Read more

    Sharad Pawar : अतिवृष्टीने केवळ शेतकरीच नव्हे, तर बारा बलुतेदार बाधित; तातडीने उपाययोजना करण्याची शरद पवारांची मागणी

    महाराष्ट्रात सध्या सर्वत्रच अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच पूर परिस्थितीमुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

    Read more

    Marathwada : नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, धाराशिवला ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

    मराठवाड्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून नांदेड, लातूर, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

    Read more

    Sharad Pawar : पीक नाही तर जमिनीचेही नुकसान भरून काढा] शरद पवारांचे राज्य सरकारला आवाहन

    राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, जनावरे आणि जनजीवन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या संसारावर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे ठोस मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून या संकटाकडे पाहून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत द्यावी, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वास्तव पाहणी केली जावी, अशी त्यांची आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे.

    Read more

    Heavy Rain : अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यांत शेती पिकाचे नुकसान; बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्यात, तातडीने मदत देणार; कृषी मंत्री भरणेंची माहिती

    महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

    Read more

    China : चिनी राज्यात 24 तासांत वर्षभराइतका पाऊस; रस्ते-घरे पाण्याखाली, रेड अलर्ट जारी; 19 हजार लोकांचे स्थलांतर

    उत्तर चीनमधील बाओडिंग शहरात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ४४८.७ मिमी पावसाची नोंद झाली, जी सरासरी वर्षभराच्या पावसाइतकी (५०० मिमी) आहे. मुसळधार पावसामुळे औद्योगिक शहरात पूर आला, रस्ते पाण्याखाली गेले, पूल आणि रस्ते तुटले आणि काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. शुक्रवारी बाओडिंगमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला.

    Read more

    Cyclone : पाकिस्तानात कराचीच्या दिशेने चक्रीवादळ, मुसळधार पाऊस, भारतात कच्छमध्ये कमी दाबाचे क्षेत्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानच्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये विशेषतः कराचीमध्ये चक्रीवादळाचा धोका आहे. भारतातील कच्छच्या रणवर कमी दाबाचे क्षेत्र असून ते हळूहळू अरबी समुद्राकडे सरकत आहे. […]

    Read more

    महाराष्ट्र-मध्य प्रदेशमध्ये रेड अलर्ट, हिमाचल-उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा इशारा!

    वाचा हवामानावरील भारतीय हवामान खात्याने दिलेले अपडेट विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान खात्याने […]

    Read more

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यानी दिले निर्देश!

    अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याच्याही केल्या आहेत सूचना विशेष प्रतिनिधी मुंबई : बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे […]

    Read more

    5 राज्यांत मुसळधार पावसाचा कहर, 72 तासांत 76 मृत्यू; उत्तराखंडमध्ये मुसळधारेचा इशारा, अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये 6 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. हिमाचलमध्ये 24 तासांत 39 ठिकाणी भूस्खलन झाले. […]

    Read more

    IMD Alert : चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ हाहाकार माजवणार? गुजरात-महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

    हवामान विभागाने दिली माहिती, ताशी पाच किमी वेगाने उत्तरेकडे सरकत असल्याचे म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी सांगितले की, […]

    Read more

    रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांसाठी बेस्ट बस आणि चहा नाश्ताची व्यवस्था करा; मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईत अतिवृष्टीसह मुसळधार पावसात रेल्वेच्या २५ ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात आणि त्यामुळे रेल्वे लोकल सेवा खंडित होते. त्यामुळे रेल्वे मार्गावरील तुंबणाऱ्या […]

    Read more

    RED ALERT : दक्षिण भारतात Red Alert ; सलग 26 दिवस पावसाचा कहर ; केरळसाठी विशेष पूर सूचना

    पावसामुळे चेन्नई आणि आंध्र प्रदेशात भिषण पुराला सामोरं जाव लागत आहे. एकूणच, दक्षिण भारतातील सामान्य जनजीवन अनेक दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुरुवार आणि […]

    Read more

    राज्यभर चंद्रकांत पाटलांची जोरदार चर्चा ; पुण्यात भर पावसात ठोकलं भाषण

    काल पुणे शहरातील नवी पेठ येथील सेनादत्त पोलीस चौकीच्या समोरील चौकाचं नामकरण सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असं करण्यात आलं. Chandrakant Patil’s vigorous discussion […]

    Read more

    केरळमध्ये पूरसदृश परिस्थिती, १८ जणांचा बळी; लष्कराकडे मदतीसाठी याचना; भूस्खलनात २२ जण बेपत्ता

    वृत्तसंस्था कोट्टायम : केरळमध्ये शनिवारपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत दक्षिण आणि मध्य भागामध्ये १८ लोकांचा मृत्यू झाला, तर कोट्टायम आणि इडुक्कीत भूस्खलनानंतर २२ जण बेपत्ता […]

    Read more

    राज्यात आजही मुसळधार पाऊस,उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट !

      राज्यातला पावसाचा मुक्काम वाढला आहे. शनिवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहणार आहे म्हणजेच आणखी दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. हवामान विभागाच्या […]

    Read more

    ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा आदी जिल्ह्यांचे पाऊसदुर्दैव सरेना; हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा

    वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्रासाठी यंदाचा पावसाळा फारच अवघड बनला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने आधीच हाहाकार माजवला असताना हवामान विभागाने पुढचे चार […]

    Read more

    महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्लीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ शक्य

    पुढच्या २४ तासांत या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांना झोडपून काढले आहे. […]

    Read more

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी; जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाळा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दोन राज्यमार्ग, एक राष्ट्रीय मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद पडली […]

    Read more