Middle East Crisis : मध्यपूर्वेतील तणावामुळे भारत सतर्क! विमानभाड्यांवर मर्यादा, ७७ लाख नोकऱ्या वाचवण्यासाठी सरकारची मोठी तयारी
मध्यपूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संकटाचा परिणाम भारतीय प्रवासी, उद्योग क्षेत्र आणि परदेशात काम करणाऱ्या लाखो भारतीयांवर होऊ नये यासाठी विमानभाड्यांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच रोजगार आणि अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.