• Download App
    fadnavis | The Focus India

    fadnavis

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण ते अंतिम उत्तर नाही

    शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेले शेतीचे नुकसान, त्यावरचे भरपाईचे पॅकेज आणि कर्जमाफीची मागणी, या सर्वांवर विरोधक सरकारला घेरत असतानाच फडणवीस यांनी कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सरकारची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.

    Read more

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा- हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसली; स्थानिकच्या निवडणुकांतही ‘माती’ होण्याचे भाकीत

    विरोधक हे सातत्याने आरोप करतात, पण कोर्ट जेव्हा त्यांना पुरावे मागते, तेव्हा ते देत नाहीत. निवडणूक आयोग देखील त्यांना पुरावे मागतो, पण एक पुराव देखील विरोधक देऊ शकत नाहीत. हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, मात्र अजुनही ते सुधरले नाहीत. महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांची अशाच प्रकारची माती होणार असल्याचे भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    Read more

    Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी फेटाळली शरद पवारांची टीका; म्हटले- जो जीता वही सिकंदर! लोकांनी आम्हाला मतदान केले, त्यांना दोष देण्याचे कारण काय?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही नव्या योजना आणल्या नाही. आता आमच्या योजना लोकांना आवडत आहेत. ते आम्हाला मतदान करत आहेत. त्यामुळे लोकांना दोष देण्याची काहीच कारण नाही. जो जीता वही सिकंदर, असे ते म्हणालेत.

    Read more

    Fadnavis : बिहारचा निकाल काँग्रेसच्या विषारी प्रचाराला जनतेचे उत्तर; मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला- काँग्रेस पक्ष MIMच्याही खाली गेला

    बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीवर असून जवळपास विजय हा निश्चितच झाल्याचे दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्ली येथे असून पत्रकारांशी संवाद साधताना बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Fadnavis : पार्थ पवार जमीन व्यवहारप्रकरणी फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले- प्राथमिक चौकशीचे आदेश, अनियमितता आढळली, तर कडक कारवाई

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून सर्व कागदपत्रे आणि सविस्तर माहिती मागवली असून, प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात समोर आलेले मुद्दे गंभीर आहेत. त्यामुळे योग्य ती चौकशी होईल आणि जर कुठे अनियमितता आढळली, तर अतिशय कडक कारवाई केली जाईल. तसेच, उपमुख्यमंत्री अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घालतील, असे मला वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे पार्थ पवारांच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे.

    Read more

    CM Fadnavis : पार्थ पवारांच्या कंपनीचे जमीन व्यवहार प्रकरण; पुणे तहसीलदारांसह उपनिबंधक निलंबित; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कारवाई

    पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर मोक्याची जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकल्याचा आणि त्यासाठी केवळ 500 रुपयांची स्टँप ड्युटी आकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ही जमीन सुमारे 1800 कोटी रुपयांची असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली असून, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक चौकशीत गैरव्यवहाराचे संकेत मिळाल्यानंतर पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

    Read more

    Fadnavis ; उद्धव ठाकरे घराबाहेर पडल्याचा आनंद, ठाकरेंचे विकासावर भाषण दाखवा अन् हजार रुपये मिळवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत. त्याचा मला आनंद आहे. पण ते टोमणे मारण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत, असे ते म्हणालेत.

    Read more

    Fadnavis : आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, देवेंद्र फडणवीसांचा टोला; वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी नसल्याची दिली माहिती

    राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना रिलीफ पॅकेज पाठवण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची कुठलीही चौकशी नसल्याची माहिती दिली.

    Read more

    फडणवीस + अजितदादांची सातारा जिल्ह्यात जाऊन वेगवेगळी राजकीय पेरणी!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी आज एकाच दिवशी सातारा जिल्ह्यात जाऊन वेगवेगळी राजकीय पेरणी केली.

    Read more

    CM Fadnavis : तरुण डॉक्टरची आत्महत्या दु:खद; आरोपींना कठोर शिक्षा होईल, कुणालाही सोडणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, तरूण महिला डॉक्टरचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचेही म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.

    Read more

    Fadnavis : फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय- बांगलादेशी घुसकोरांना बसणार आळा, ब्लॅक लिस्टसह शिधा पत्रिका पडताळणीचे निर्देश

    राज्यात वाढत असलेल्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची ब्लॅकलिस्ट तयार करण्याचे आणि शिधापत्रिकांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, राज्य शासनाने नवीन शिधापत्रिकेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत.

    Read more

    60 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत दिवाळीच्या आत!!

    महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे तब्बल 60 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजून नुकसानीच्या सर्व प्रकारच्या डेटाचे वर्गीकरण व्हायचे आहे.

    Read more

    Fadnavis : फडणवीस सरकारची अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत सुरू, मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख, जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार

    राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला असून, सुमारे 84 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पीडितांना तातडीची मदत देण्यास सुरुवात केली आहे.

    Read more

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- बीड-अहिल्यानगर रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण, आजचा दिवस श्रेयवादाचा नाही, तर आनंदाचा!

    अनेक वर्षांची प्रतीक्षा, तीन पिढ्यांचे स्वप्न आणि अथक प्रयत्नांनंतर अखेर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर बीडच्या भूमीवर रेल्वे धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. बीडमध्ये सुरू झालेली ही रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण करतो असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केले.

    Read more

    Fadnavis : फडणवीसांनी अमेरिकेला ठणकावले- हा नवा भारत, मोदीजींचा भारत, परराष्ट्र धोरण आम्ही ठरवतो, कोणीही हुकूम देऊ शकत नाही

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही म्हणो किंवा न म्हणो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण स्वतः बनवतो. ज्यावर इतर कोणताही देश हे धोरण लादू शकत नाही. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. त्यानंतर फडणवीस यांचे हे विधान समोर आले आहे.

    Read more

    Sharad Pawar : मराठा आरक्षणावरून शरद पवारांचे केंद्राकडे बोट; ते पुजनीय,आदरणीय, वंदनीय म्हणत अजितदादांचा टोला

    मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. मराठा आरक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे, असे शरद पवारांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी, ‘ते पुजणीय,आदरणीय, वंदनीय’ असे म्हणत “मला जास्त बोलायला लावू नका,” असा टोला शरद पवारांना लगावला. यामुळे मराठा आरक्षणावरून काका-पुतणे भिडल्याचे पाहायला मिळाले.

    Read more

    Fadnavis : राहुल गांधी ‘सिरियल लायर’ त्यांच्याकडून माफीची अपेक्षाच नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका; लोकनीती-CSDSच्या माफीने वातावरण तापले

    महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदार संख्येतील फरकाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर लोकनीती-CSDS या नामांकित सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. मतदार संख्या तुलना करताना संस्थेकडून गंभीर घोडचूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, याची कबुली संस्थेचे सह-संचालक संजय कुमार यांनी स्वतः दिली आहे. त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र, आता राहुल गांधी माफी मागतील का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

    Read more

    Fadnavis : समाजाच्या आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे; कबुतरखानाप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

    मुंबईतील कबुतरखान्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, पहिल्यांदा लोकांचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे. त्याचसोबत काही आस्थेचे विषय आहेत त्याची पण आपण काळजी घेऊ शकतो. त्यातून आपण मार्ग काढू शकतो. समाजाचे आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टीचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. तसेच हा वादाचा मुद्दा नसून हा समाजाचा प्रश्न असल्याचे फडणवीस म्हणाले.

    Read more

    Fadnavis : फडणवीस सरकारचे निर्णय- महाराष्ट्रात 15 हजार पोलिसांची भरती; विविध कर्ज योजनांतील जामीनदाराची अटही शिथिल

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात तब्बल 15 हजार पोलिसांची भरती करण्याच्या महत्त्वकांक्षी प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्यातील हजारो तरुण गत अनेक वर्षांपासून या पोलिस भरतीची प्रतिक्षा करत होते. अखेर सरकारने हा निर्णय हातावेगळा करून त्यांची मागणी पूर्ण केली आहे. प्रस्तुत निर्णयामुळे राज्यातील हजारो तरुणांचे पोलिस बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

    Read more

    Bawankule : बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार: “खंडणीखोरांचे सरदार कोण, हे जनतेला ठाऊक आहे”

    मुंबईत राजकीय तापमान चढवणारा शाब्दिक वाद सुरू झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महायुती सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर “चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर” असा आरोप करत जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ भाजप नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट पलटवार करत उद्धव ठाकरेंवर खंडणीखोरीचे गंभीर आरोप लावले.

    Read more

    Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; राज्यातील 10 जिल्ह्यांत उमेद मॉल, महिलांसाठी गोंदिया, रत्नागिरी-वाशीम येथे विशेष न्यायालयाची स्थापना

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्राथमिक तत्त्वावर राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर महिलांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशीम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

    Read more

    Fadnavis : JNUमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे भाषण: मराठीचा अभिमान, शिवरायांचे सामर्थ्य आणि भाषावादावर ठाम मत

    दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा आणि शिवरायांच्या सामरिक शिक्षणावर आधारित दोन महत्त्वपूर्ण केंद्रांचे उद्घाटन केले. या वेळी दिलेल्या भाषणात त्यांनी मराठी भाषा, इतर भारतीय भाषांचे महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे सामरिक विचार आणि सध्या सुरू असलेल्या भाषावादावर सखोल भाष्य केले. भाषणात त्यांनी भाषा, संस्कृती आणि अभिमान यांचे समतोल साधताना एक समंजस, पण ठाम भूमिका मांडली.

    Read more

    Fadnavis : राहुल गांधी अतिडाव्या विचारसरणीने ग्रस्त; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसच्या भूमिकेवर निशाणा

    काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला आता काँग्रेस विरोध करत आहे. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली आहे.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत नाराजी; हाणामारीच्या घटनेने एकाची नव्हे इथल्या प्रत्येकाची प्रतिमा मलिन!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या परिसरात गुरूवारी झालेल्या हाणामारीवर तीव्र संताप व्यक्त केला. कालच्या घटनेमुळे कुणा एकाची प्रतिष्ठा गेली नाही. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. आज या ज्या शिव्या बाहेर पडत आहेत, त्या एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते की, हे सगळे आमदार माजले म्हणून, असे ते म्हणालेत.

    Read more

    Fadnavis : एखाद्याला भेटले म्हणजे युतीसाठी भेटणे नाही; CM फडणवीस यांचे उद्धव ठाकरे भेटीवर स्पष्टीकरण

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बुधवारी निरोप समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांचे कौतुक करत टोलेबाजी देखील केली. यावेळी सभागृहात उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी त्यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली होती. तिकडे स्कोप नाही पण इकडे आहे, तुम्ही येऊ शकता, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून म्हटले.

    Read more