द फोकस एक्सप्लेनर: सरकारचा नवा निर्णय- आता एसीचे तापमान 20°C पेक्षा कमी ठेवता येणार नाही
गेल्या काही वर्षांत भारतात उन्हाळा प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५°C पेक्षा जास्त जात आहे. त्यामुळे लोक जास्तीत जास्त एअर कंडिशनर (AC) वापरत आहेत. पण हे AC चालवण्यासाठी खूप वीज लागते. त्यामुळे विजेचा खर्चही वाढतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. यामुळेच सरकारनं आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.