Bihar : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात 68.52% मतदान; 2020च्या निवडणुकीपेक्षा 10% अधिक मतदान
2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपले आहे. दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात २० जिल्ह्यांमधील १२२ जागांसाठी ६८.५२% मतदान झाले.
2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपले आहे. दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात २० जिल्ह्यांमधील १२२ जागांसाठी ६८.५२% मतदान झाले.
दक्षिण भारतीय अभिनेता विजय थलपथीच्या तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) या पक्षाने बुधवारी महाबलीपुरम येथील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी विजयला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले. पक्षाने त्याला निवडणूक युतीबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकारही दिले.
भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ५०% पेक्षा जास्त मते मिळवत विजय मिळवला आहे.
निवडणूक आयोगाने (ECI) शुक्रवारी गेल्या सहा वर्षांत कोणतीही निवडणूक न लढवलेल्या ४७४ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची यादी रद्द केली. या कारवाईनंतर, गेल्या दोन महिन्यांत ८०८ पक्षांना यादीतून काढून टाकण्यात आले आहे. आयोगाने असेही म्हटले आहे की, ९ ऑगस्ट रोजी ३३४ पक्षांची नोंदणी यापूर्वी रद्द करण्यात आली होती.
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला (एसईसी) पालिका निवडणुका ३ वर्षांनी पुढे ढकलल्याबद्दल फटकारले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात राजकीय युती निश्चित झाल्याचे संकेत ठाकरे गटाच्या नेत्याकडून मिळत आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण आज जाहीर झाले. त्यात ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार असून, छत्रपती संभाजीनगरची जागा सर्वसाधारण गटासाठी सुटली आहे. सरकारने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षणही जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता निर्माणि झाली आहे.
सीपी राधाकृष्णन हे देशाचे १५ वे उपराष्ट्रपती असतील. एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली. तर आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना ३०० पहिल्या पसंतीची मते मिळाली. राधाकृष्णन १५२ मतांच्या फरकाने विजयी झाले.
अमेरिकेतील टेक्सास येथील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार व्हॅलेंटिना गोमेझ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्या कुराण (इस्लामचा पवित्र ग्रंथ) जाळताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारांच्या संख्येतील तफावतीचा चुकीचा दावा करणे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ला (सीएसडीएस) अंगलट आले आहे. याप्रकरणी माफी मागितल्यानंतरही सीएसडीएसला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा विचार भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएसएसआर) केला आहे. डेटातील फेरफारीने सीएसडीएसकडून अनुदान-सहाय्य नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका आयसीएसएसआरने ठेवला आहे.
एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यापूर्वी त्यांनी संसदेच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. त्यांच्यासोबत २० प्रस्तावक आणि २० समर्थकांसह सुमारे १६० सदस्य उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
भारताने मंगळवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली. त्यांचा सामना एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांच्याशी होईल.
महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदार संख्येतील फरकाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर लोकनीती-CSDS या नामांकित सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. मतदार संख्या तुलना करताना संस्थेकडून गंभीर घोडचूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, याची कबुली संस्थेचे सह-संचालक संजय कुमार यांनी स्वतः दिली आहे. त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र, आता राहुल गांधी माफी मागतील का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवाराचे नाव १७ ऑगस्ट रोजी अंतिम केले जाईल. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भाजप संसदीय मंडळाची बैठक रविवारी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे, ज्यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम केले जाऊ शकते.
बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) (सोप्या भाषेत, मतदार यादी पडताळणी) बद्दल सुनावणी केली.सर्वोच्च न्यायालयाने एसआयआरला मतदार-अनुकूल असे वर्णन केले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की निवडणूक आयोगाने ११ कागदपत्रांपैकी कोणतेही एक मागितले आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले की, “फक्त एक जागा नाही तर अनेक जागा आहेत जिथे मतदार याद्यांमध्ये छेडछाड केली जात आहे. हे राष्ट्रीय पातळीवर पद्धतशीरपणे केले जात आहे.” बिहारच्या अद्ययावत मतदार यादीत १२४ वर्षीय ‘पहिल्यांदाच मतदार’ झालेल्या मिंता देवीच्या प्रश्नावर राहुल म्हणाले- हो, मी त्यांच्याबद्दल ऐकले आहे. अशी एक नाही तर अमर्यादित प्रकरणे आहेत. चित्र अद्याप समोर आलेले नाही.
बिहारमध्ये सुरू असलेल्या सखोल मतदार पुनरीक्षणावर (एसआयआर) निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात उत्तर सादर केले. आयोगाने म्हटले की, प्रारूप मतदार यादीतून बाहेर झालेल्या मतदारांची वेगळी यादी बनवणे वा त्यांची नावे समाविष्ट न करण्याची कारणे सांगणे वर्तमान कायद्यात बंधनकारक नाही.
कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (CEO) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून त्यांच्या मतचोरीच्या विधानाचे पुरावे मागितले आहेत. ७ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १ लाखाहून अधिक मते चोरीला गेल्याचा आणि एका महिलेने दोनदा मतदान केल्याचा आरोप केला होता.
निवडणूक आयोगाने भाजपसोबत मिळून निवडणूक चोरल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. महाराष्ट्रात 40 लाख संशयित नावे असल्याचा दावाही त्यांनी केला. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी हरतात तेव्हा आरोप करतात, हा त्यांचा करंटेपणा असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. तर राहुल गांधी हे बालिषपणासारखे आरोप करत असून, तो त्यांचा पोरकटपणा असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मतदार यादीतील अनियमिततेवर १ तास ११ मिनिटे २२ पानांचे सादरीकरण दिले. राहुल गांधी यांनी कर्नाटकची मतदार यादी स्क्रीनवर दाखवली आणि सांगितले की, मतदार यादीत संशयास्पद मतदार आहेत.
महाराष्ट्रात आणि देशात कुठेही मतदानाची चोरी झालेली नाही. तर राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राहुल गांधी प्रत्येक वेळी खोटे बोलून पळून जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वास्तविक आगामी काळातील निवडणुकीत त्यांना पराजय दिसत आहे. त्यामुळे आधीच कव्हर फायरिंग साठी ते असे आरोप करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी 21 ऑगस्टपर्यंत नामांकन दाखल केले जाईल. जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला.
राज्यात लक्ष वेधून घेतलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने मोठा विजय मिळवला आहे. या पॅनेलने 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवत कारखान्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले. दुसरीकडे, सहकार बचाव पॅनेलच्या वाट्याला केवळ एक जागा आली असून, शरद पवारांच्या बळीराजा पॅनेलला एकही जागा मिळाली नाही.
निवडणूक आयोगाने (EC) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी त्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. ANI नुसार, हे पत्र १२ जून रोजी मेलद्वारे आणि राहुल यांच्या निवासस्थानी देखील पाठवण्यात आले.
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नाही तर राहुल गांधी यांच्या अपमानास्पद पराभवाचे दुःख वाढले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते अजून किती काळ हवेत बाण सोडत राहणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.