‘कुत्रा-मुक्त गाव’च्या नावाखाली हत्या; तेलंगणात 1600 कुत्र्यांना मारले
तेलंगणातील गावांमध्ये आता एक विचित्र शांतता आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत गावात एखादा अनोळखी व्यक्ती आला की, भटके कुत्रे भुंकून-भुंकून गावाला सावध करत असत. आता इथे कोणतीही हालचाल होत नाही. ही परिस्थिती केवळ एकाच गावाची नाही. राज्यातील सहा जिल्ह्यांमधील 12 हून अधिक गावांमध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 1600 हून अधिक कुत्रे मारल्याचे आरोप समोर आले आहेत. सुरुवातीला ही संख्या कमी होती. हळूहळू हा आकडा वाढत गेला.