फडणवीस – शिंदे – फडणवीस आलटून – पालटून मुख्यमंत्री; पवार काका – पुतण्यांसमोर फडणवीसांची फटकेबाजी!!
फडणवीस – शिंदे – फडणवीस असे आलटून पालटून मुख्यमंत्री; पवार काका पुतण्यांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी!!, हा प्रकार आज कोल्हापूरमध्ये घडला.
फडणवीस – शिंदे – फडणवीस असे आलटून पालटून मुख्यमंत्री; पवार काका पुतण्यांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी!!, हा प्रकार आज कोल्हापूरमध्ये घडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मंगळवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 वर्षे पूर्ण होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारने राज्यातील आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. आरोग्य सुविधांच्या या विकेंद्रीकरणाचाही जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परतीच्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करताना पडोळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकीवजा इशारा दिला आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातल्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांमध्ये लक्ष घातले. या प्रकल्पांमध्ये नेमके काय अडथळे आहेत
शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसकट ठाकरे बंधू मुंबईच्या सत्याच्या मोर्चात; पण देवेंद्र फडणवीस मात्र बिहार निवडणुकीच्या प्रचारात!!, असे आजच्या दिवसभरातले राजकीय चित्र राहिले पण त्यातले अर्धेच चित्र मराठी माध्यमांनी दाखविले.
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन, राज्याचे पोलिस महासंचालक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, हा संपूर्ण तपास एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडून केला जाईल, जेणेकरून प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी.
राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री येथे केली. कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
Prahar leader Bachchu Kadu meet Chief Minister Devendra Fadnavis today discuss farmers debt waiver issues. Kadu warn VIDEOS action rail roko if discussion fail. Raju Shetti, Ajit Navale join meeting negotiate solution.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग: इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लिडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ या रिपोर्टचे प्रकाशन केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विकसित महाराष्ट्र 2047 या महत्त्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील देण्यात आला असून, याशिवाय नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, जात वैधता प्रमाणपत्राबाबतच्या मुदती, तसेच न्यायालयीन आणि महसूल विभागाशी संबंधित मंजुरी देण्यात आली आहे. विविध विभागांमधील एकूण सात मोठ्या निर्णयांमुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्यावरून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री व प्रशासनात चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत सरकारने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप केला. त्यावर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना आजपर्यंत करण्यात आलेल्या मदतीची आकडेवारी सादर करण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण, सातारा येथे कृतज्ञता मेळाव्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमीत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण आणि माणदेश भागातील सर्वांगीण प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या आणि आमदार झालेल्या समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना एकत्र आणायचा घाट घातलाय.
आशियातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाणारी बृहन्मुंबई महानगरपालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मागील काही वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक राज सुरू आहे. अशा स्थितीत महापालिकेतील बदली आणि बढती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप समोर आले आहेत. या संदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओबीसी समाजासाठी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता लक्षात घेऊन त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण विधान केले. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांची केवळ घोषणा झाली होती, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर 60 नवीन ओबीसी वसतिगृहे सुरू केली. तसेच, 10 लाख ओबीसींना हक्काची घरे दिली आणि समाजासाठी असलेली आर्थिक महामंडळेही मजबूत केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे आज ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्यात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. या मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच ओबीसी समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी नवीन योजना राबवून नव्या पिढीला सक्षम करण्याच्या उद्देशाने महाज्योती संस्थेची स्थापना करण्यात आली.
राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक झाला असून, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन आदेशामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आले असून, ओबीसी समाजाची मसलत संपल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
छगन भुजबळ यांना काही अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री केलेले नाही. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री केले आहे. त्यांचे जातीय राजकारण आहे. ते पंतप्रधान असताना स्वत:ला ओबीसींचे नेते समजतात आणि त्यातून भुजबळांना मंत्रिपद देण्यात आले आहे. विखे पाटलांवर भुजबळ बोलत असतील तर ते राज्यातील मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील सभेवर तीव्र आक्षेप घेत, ती ओबीसीची नव्हे, तर जिल्ह्यावर दबाव निर्माण करण्यासाठी घेतलेली आणि मराठ्यांच्या राजकीय अस्तित्वावर घाला घालणारी सभा असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीवर निशाणा साधला. एवढे गोंधळलेले विरोधक मी केव्हाच पाहिले नाहीत. कोणत्या मुद्यावर कुठे जावे हे ही या लोकांना माहिती नाही, असे ते विरोधकांची खिल्ली उडवताना म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारने पाऊस आणल्याची टीका करणाऱ्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचाही समाचार घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथे ₹6 कोटींचे बक्षीस असणाऱ्या वरिष्ठ माओवादी कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू भूपती यांचे इतर 60 माओवादी सदस्यांसह आत्मसमर्पण केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक शक्ती व देशभक्त संघटना आहे. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांकडे आम्ही ढुंकूणही पाहत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघावर बंदी घालण्यासंबंधी काँग्रेसने केलेली मागणी धुडकावून लावली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘एचपी ड्रीम्स अनलॉक्ड सीझन 1’चे उदघाटन संपन्न झाले. आजचा काळ हा एआयचा आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. (MADC) आणि फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल यांच्यात नागपूरमध्ये जागतिक दर्जाचे प्रदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. कमळाच्या आकाराच्या डिझाइन असलेल्या या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असून, त्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे; येथून नियमित उड्डाणे डिसेंबरमध्ये सुरू होतील. मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या या प्रकल्पाला शेतकरी नेते डी.बी. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 10 वर्षांचे अडथळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात दूर झाले आणि हे एअरपोर्ट तयार झाले.