Manoj Jarange : मराठा-कुणबी मंत्रालयाच्या मागणीला मुख्यमंत्र्यांची तत्त्वतः मंजुरी?; मनोज जरांगे म्हणाले- “सरकारने एक महिन्यात घोषणा करावी”
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याचा दावा केला असून आता “मराठा-कुणबी मंत्रालय” स्थापन करण्याच्या मागणीवर पुन्हा जोर दिला आहे. जरांगे यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला तत्त्वतः सकारात्मक प्रतिसाद दिला असून सरकारने एका महिन्याच्या आत अधिकृत घोषणा करावी, अशी अपेक्षा आहे.