Garib Nagar : मुंबईत दहशतवादी कटाचा मोठा खुलासा; ‘गरीब नगर’चा बदला घेण्यासाठी हल्ल्याची तयारी
मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उधळल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ‘गरीब नगर’ भागातील कारवाईचा बदला घेण्यासाठी काही संशयितांकडून दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरू होती. या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून मुंबईतील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.